मुंबई – हिंदी सिनेसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांनी व्याघ्र संरक्षणासाठी काम करण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रस्ताव मान्य केला आहे. यापुढे अमिताभ बच्चन महाराष्ट्राच्या वाघ संरक्षण योजनेचे ब्रॅंड अँबॅसिडर असतील. राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अमिताभ बच्चन आणि सचिन तेंडुलकर यांना पत्र लिहून व्याघ्र संरक्षण योजनेचे ब्रँड अँबॅसिडर होण्याचे निमंत्रण दिले होते. वाघांबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करुन व्याघ्र संरक्षण आणि पर्यटनाला चालना मिळावी यासाठी आपण व्याघ्र संरक्षण योजनेचे अँबॅसिडर व्हावे असे मुनगंटीवार यांनी पत्रात म्हटले होते.









