पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..

देशात रस्ते किती झाले यापेक्षा,...

पशाची चिंता नाही, हवी फक्त जिद्द..
 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार

रायगड – जिल्ह्यातील कर्जतजवळील...

 नेरळमध्ये घराची भिंत कोसळून पाच जण ठार
चित्त थरारक स्टंट

चित्त थरारक स्टंट

यवतमाळ – येथील ब्रदर्स एट  आर्म्स...

चित्त थरारक स्टंट
गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

गोंदिया – आमगाव रोडवरील अदासी जवळ...

गोंदियात धावत्या नॅनोला लागली आग

Archive for July, 2015

  आंबेडकरी कवी केतन पिंपळापुरे यांचे निधन 0

आंबेडकरी कवी केतन पिंपळापुरे यांचे निधन

ketan p

यवतमाळ –  प्रसिद्ध आंबेडकरी कवी, विचारवंत, लेखक, पत्रकार, चित्रकार केतन पिंपळापुरे यांचे आज शुक्रवारी ३१ जुलै रोजी ४.३० वाजता हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. मृत्यू समयी ते ५० वर्षाचे होते.

राळेगाव तालुक्यातील पिंपळापूर हे त्यांचे मूळगाव. गत काही दिवसापासून कावीळने आजारी असल्याने सेवाग्राम येथील कस्तुरबा मेडीकल कॉलेजमध्ये उपचार सुरू होते. मात्र त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने पुढील उपचारासाठी हैद्राबाद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचाराला प्रतिसाद न मिळाल्याने अखेर आज केतन पिंपळापुरे यांची प्राणज्योत मालवली. संवेदनशील कवी म्हणून उभ्या महाराष्टÑाला परिचित असलेल्या पिंपळापुरेंनी आपल्यातील कार्यकर्त्याच्या मूळ पिंडाला तडा जाऊ दिला नाही. आतापर्यंत त्यांचे सूर्यकंकण, मार्शलरेस, डेमोफून, मकाबी, हेमलॉक असे पाच काव्यसंग्रह प्रकाशित झाले आहे. मकाबी या काव्यसंग्रहाला राज्यातच नव्हे तर देशभरात प्रसिद्धी मिळाली. मकाबीच्या निर्मितीबद्दल त्यांना महाकवी वामनदादा कर्डक पुरस्कार, बाबा आमटे पुरस्कार, वादळवारायासह अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. नोबल ट्रूथ (महाकाव्य), वेटींग फॉर व्हीसा ही साहित्यकृती प्रकाशनाच्या वाटेवर होती. ‘आत्यंतिक भौतिकतेच्या आहारी जाऊन मूल्यांची कत्तल करीत निघालेल्या या जगाला करीत निघालेल्या या जगाला कुठंतरी थांबवच लागणार आहे. ते जिथे थांबेल त्या शतकाच्या वेशीवर माझाी कविता ओंजळीत करुणेची फुल घेऊन उभी असेल, इतका उदंड विश्वास माझ्या प्राणात भरलेला आहे’. एवढा आशावादी कवी होता. नामांतर आंदोलन, रिडल्स, घाटकोपर, खैरलांजी आदी आंदोलनात त्यांचा सहभाग राहिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्थापित समता सैनिक दल या सामाजिक संघटनेचे केंद्रीय मार्गदर्शक म्हणून काम बघत होते. नागपूर येथून प्रकाशित होणाºया दैनिकात पुरवणी संपादक म्हणून कार्यरत होते. साहित्यक्षेत्रातील अनेक नवोदीत कविंना प्रोत्साहीत करण्याचे काम केतन पिंपळापुरे यांनी केले. त्यांच्या निधनाची दु:खद वार्ता धडकताच मित्रपरिवार शोकसागरात बुडाला. आंबेडकरी चळवळीला उर्जा देणार लेखन करणारा उमदा लेखक, मित्र गमविल्याबद्दल सर्वच स्तरातूळ हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर उद्या १ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता नागपूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा कॅसाब्लांका, भाऊ, बहीण व बराच मोठा आप्त परिवार आहे.

July 31, 2015 in मुख्य पान
 ज्येष्ठ रिपाइं नेते रा.सू.गवई यांचे निधन 0

ज्येष्ठ रिपाइं नेते रा.सू.गवई यांचे निधन


नागपूर, दि. २५ –  ज्येष्ठ रिपब्लिकन नेते रा. सू. गवई यांचे दीर्घ आजाराने आज निधन झाले. वयाच्या ८६ व्या वर्षी नागपूरमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे.
महाराष्ट्रातील दलित चळवळीचे एक अग्रणी नेते असलेल्या गवई यांनी बिहार व केरळचे माजी राज्यपालपद भूषवले. त्यांचा जन्म १९२९ साली अमरावतीत झाला. गवई यांनी दलितांच्या प्रश्नासाठी सतत आवाज उठवला. दलित चळवळीप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकारणातही त्यांचे महत्वाचे स्थान होते.
गवई यांचा जीवनपट :
रामकृष्ण सूर्यभान गवई – जन्म ३० ऑक्टोबर १९२९
जन्मस्थळ : दारापुर जिल्हा अमरावती
शैक्षणक पात्रता: नागपुर विद्यापीठ (महाराष्ट् )चे पदवीधर
भूषवलेली पदे
सभासद महाराष्ट्र विधान परिषद्
उपाध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषद – १९६८-७८
अध्यक्ष महाराष्ट्र विधान परिषद १९७८-८२
कॉमनवेल्थ पर्लमेंटरी असोसिएशन महाराष्ट् शाखेचे सयुक्त उपाध्यक्ष
१२ डिसेबर १९८६ ते डिसेंबर १९८८ विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधान परिषद्
१९९८-९९ सदस बारावी लोकसभा
एप्रिल २००० राज्यसभेवर निवडून आले
मिळालेले सन्मान
कुष्ठरोगिकरिता बहुमूल्य मदत व सहाय्य याबद्दल मिळालेले कुष्ठमित्र अवार्ड आणि कुष्ठरोगियांचा मित्र अवार्ड
प्रियदर्शनी ग्रुप ,मुंबई यांचे माध्यमातून समाजसेवेचे उल्लेखनीय कार्य तसेच अस्पृश्यता निर्मूलन आणि कुष्ठरोग या क्षेत्रात केलेल्या प्रशसनीय कार्यबद्दल पुरस्कार
डॉ बाबासाहेब अम्बेडकर यांचे भव्य मध्यवर्ती स्मारक उभे राहावे याकरिता घेतलेले परिश्रम याकरिता ईश्वरी देवी अॅवार्ड
इतर माहिती
विद्यार्थी दशेपासून सामजिक व राजकिय चळवळीत सक्रीय सहभाग ,महाराष्ट्र विधान परिषदचे अखंड तिस वर्ष सभासदत्व (२६जुले १९९४) रोजी निवृत्त )महाराष्ट्र राज्यात एम्प्लॉयमेंट गारंटी स्कीम सुरु व्हावी यeकरिता महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री श्री वसंतराव नाइक आणि महाराष्ट्र विधान परीषदेचे तत्कालीन अध्यक्ष श्री व्ही एस पागे याच्या सहकार्यातून पायाभूत काम केले
अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ,उपाध्यक्ष जागतिक बौद्ध फेलोशिप(सेन्ट्रल जनरल कौंसिल ऑफ़  जागतिक बौद्ध फेलोशिप यांच्या बैंकॉक येथील सभेत एकमताने निवड) त्यांच्या संस्थेत 1998 मध्ये पुन्हा निवड
दादासाहेबानी आपल्या दलित बांधवांच्या उद्घारासाठी भरीव कामगिरी तर केलिच त्याचबरोबर जातिभेद ,धर्मभेद वा पंथभेद पाळुन स्वजातियाना सवलती देऊन इतराणा दूर ढकलन्याचा आपपभाव कधीच दाखवला नाही .
भूतपूर्व चेयमन ,धार्मिक आणि भाषिक उपसमिति अल्पसंख्यांकविषय महाराष्ट्र राज्य
अमरावती येथे1989 साली भरलेल्या ६२ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष
अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिति दीक्षाभूमि नागपुर आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ अमरावती
नियुक्ति डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे साहित्य आणि व्याख्याने महाराष्ट्र विषयक महाराष्ट्र राज्य समितीचे उपाध्यक्ष
मुंबई व अन्यत्र झालेल्या दंगलीनंतर महाराष्ट्राचे राज्यपाल आणि अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शांतता आणि सादभाव निर्माण करण्याकरिता स्थापन झालेल्या राज्य शांतता समितीचे सभासद
२२ जून २००६ पासून १० जुलै २००८ पर्यन्त बिहारचे राज्यपाल
१० जुले २००८ ते ७ सप्टेंबर २०११ केरळ चे राज्यपाल
मृत्यू –.  २५ जुलै २०१५

July 25, 2015 in मुख्य पान
पत्नीच्या प्रियकराचा खून 0

पत्नीच्या प्रियकराचा खून

images
यवतमाळ, दि.१९ – अनैतिक संबंधातून पतीसह तीन जणांनी पत्नीच्या प्रियकराचा खून केल्याची घटना यवतमाळ तालुक्यातील जामडोह येथे १८ जुलै रोजी रात्री ही घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे.
देविदास लखमा गुजरे (४०) रा. जामडोह असे मृतकाचे तर रतन शंकर वाठोळकर, पप्पू, बाल्या, बिडी अशी आरोपींची नावे आहे. मृतक देविदास गुजरे याचे गावातील रतन शंकर वाठोळकर याच्या पत्नीसोबत सूत जुळले होते. त्याच्या संबंधाची भनक रतनला लागली होती. त्या दोघांनाही आरोपीची समजुत काढल्यानंतरही ऐंकत नव्हते. आरोपी रतन वाठोळकरने तीन साथीदाराच्या मदतीने कट रचून देविदासचा काटा काढण्याचा बेत आखला. दरम्यान १८ जुलै रोजी रात्री ८ वाजता आरोपींनी धारदार सशस्त्रांनी सपासवर वार करून देविदास गुजरेचा जागीच खात्मा केला. या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदणे, शहरचे ठाणेदार मुकुंद कुळकर्णी, पोलीस उपनिरीक्षक रितेश राऊत, रवी सुरोशे व पोलीस पथकाने घटनास्थळ गाठले. घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी मृतकाची बहिण शोभा विठ्ठल कुंभेकर (४५) रा. जामडोह यांनी दिलेल्या तक्रारीवरून चारही आरोपीविरुद्घ भादंवि कलम ३०२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून चौकशीसाठी ताब्यात घेतले.

July 19, 2015 in मुख्य पान
दरड कोसळून दोन ठार 0

दरड कोसळून दोन ठार

2015-07-19-darad_ns
पुणे, दि. १९ – मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. दरड कोसळल्याने मुंबई – पुणे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांनी जुन्या मुंबई – पुणे महामार्गावरुन प्रवास करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
खोपोलीजवळील आडोशी बोगद्याजवळ रविवारी सकाळी दरड कोसळली. ही दरड दोन चारचाकी वाहनांवर कोसळल्याने या दुर्घटनेत दोघा प्रवाशांचा मृत्यू झाला. दिलीप पटेल व शशिकांत धामणकर अशी या मृतांची नावे आहेत. तर तीन महिला प्रवासी अपघातात जखमी झाल्या आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघातामुळे मुंबई व पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प पडली होती. दुपारनंतर एक्सप्रेस वेवरील मुंबईकडे जाणारा एकेरी मार्ग खुला करण्यात आला असून या मार्गावरील वाहतूक अत्यंत संथगतीने सुरु आहे.
एक्सप्रेस वेवरील अपघाताच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला. मृतांच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणाही त्यांनी केली आहे. एक्सप्रेस वे खोळंबल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत असून या प्रवासांना रेल्वेकडून दिलासा मिळाला आहे. रेल्वेने मुंबई व पुणे स्थानकावरुन रात्री आठच्या सुमारास विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

July 19, 2015 in मुख्य पान
 टीम इंडियाचा विजयी 0

टीम इंडियाचा विजयी

Harare
हरारे, दि. १९ – ग्रीम क्रेमरच्या फिरकीने भारताला गुंडाळले असून दुस-या टी -२० सामन्यात झिम्बाव्बेने भारतावर १० धावांनी विजय मिळवत दोन सामन्यांच्या मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली. रॉबिन उथप्पाच्या ४२ धावांचा अपवाद वगळता एकही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
हरारे येथे रंगलेल्या दुस-या टी -२० सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाज निर्णय घेतला. झिम्बाब्वेचा सलामीवीर चामू चिभाभाने ६७ धावांची खेळी करत संघाला १४५ धावांचा पल्ला गाठून दिला. झिम्बाब्वेने २० षटकांत ७ गडी गमावत १४५ धावा केल्या. भारतातर्फे मोहित शर्मा व भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. झिम्बाब्वेच्या १४६ धावांचे माफक लक्ष्य गाठण्यासाठी भारताची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार अजिंक्य रहाणे ३ धावांवर धावबाद झाला. रॉबिन उथप्पा व मुरली विजयने फटकेबाजी करत भारतीय संघाला अर्धशतकापर्यंत पोहोचवले. मात्र मुरली विजय १३ धावांवर बाद झाल्यावर भारताची फलंदाजी अक्षरशः कोलमडली. रॉबिन उथप्पाने एकाकी झुंज देत ४२ धावा केल्या. मात्र फटकेबाजीच्या प्रयत्नात तोदेखील बाद झाला. केदार जाधव ५ तर मनिष पांडे भोपळा न फोडताच माघारी परतला. यानंतर स्टुअर्ट बिन्नीने २४ धावा तर संजू सॅमसनने १९ धावांची खेळी करत संघाच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. मात्र एकही फलंदाज भारताला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारताला २० षटकांत ९ गडी गमावत १३५ धावाच करता आल्या. झिम्बाब्वेच्या ग्रीम क्रेमरने ४ षटकांत १८ धावा देत तीन विकेट घेतल्या. क्रेमरच्या फिरकीने भारतीय फलंदाजांना लगाम लावला. या सामन्यात भारताचे तीन फलंदाज धावबाद झाले. एकदिवसीय मालिकेत झिम्बाब्वेला क्लीन स्वीप दिल्यानंतर टी – २० मालिकेतही झिम्बाब्वेवर विजय मिळवण्याचा कर्णधार अजिंक्य रहाणेचा निर्धार होता. मात्र दोन सामन्यांची टी -२० मालिका झिम्बाब्वेला १-१ अशा बरोबरीत सोडवण्यात यश आले.

'लोडशेडिंग' कमीसाठी आमदाराला बांधले 0

‘लोडशेडिंग’ कमीसाठी आमदाराला बांधले

01 मुगलसराय (उत्तरप्रदेश) सतत लोडशेडिंगच्या होणा-या त्रासाला कंटाळून लोकांनी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या एका आमदाराला चक्क बांधून ठेवल्याची घटना उत्तर प्रदेशातील मुगलसराय येथे रविवारी घडली. लोडशेडिंगची कपात कमी करावी अशी वेळोवेळी मागणी करुनही त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने संतापलेल्या लोकांनी हे पाऊल उचलले. शनिवारी देशभरात ईद उत्साहात साजरी करण्यात आली. ईदचे औचित्य साधून बसपाचे आमदार बब्बन सिंह चौहान आणि स्थानिय नेते कयामुद्दीन हे रविवारी सकाळी मुगलसरायमधील चंदौलीमध्ये गेले असता, सततच्या लोडशेडिंगला कंटाळलेल्या लोकांनी आमदाराच्या शुभेच्या स्वीकारण्याऐवजी त्यांना दोरीने बांधून ठेवले. हा सर्व प्रकार पोलिसांच्या उपस्थित झाला. जमाव मोठा असल्याने पोलीसही काहीच करु शकले नाहीत. संतप्त झालेल्या लोकांनी जवळपाल दीड तास आमदाराला दोरीने बांधून ठेवले. लोकांनी आमदाराला बांधून ठेवल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आमदारांनी स्थानिक लोकांना लोडशेडिंग कमी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर लोकांनी आमदाराची सुटका केली. दरम्यान, उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात वीजेची चोरी होत असल्याने याला आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड २१ जुलै पासून वीज चोरीविरुद्ध अभियान राबविणार आहे.

July 19, 2015 in मुख्य पान
फेसबुकवरील मैत्रीमुळे डॉक्टरला २५ लाखाचा गंडा 0

फेसबुकवरील मैत्रीमुळे डॉक्टरला २५ लाखाचा गंडा

Facebook new feature
उस्मानाबाद – तुळजापूर येथील उच्चशिक्षित डॉक्टरला फेसबुकवरून मैत्री करणे महागात पडले आहे. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून (सोशल मिडीया) आकर्षित व भुरळ पाडणारे फोटो दाखवत लग्नाचे आमिष दाखवून एका तरुण डॉक्टरला २५ लाखाचा गंडा एका टोळीने घातला.
तुळजापूर येथील अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. पवन पाटील (रा. पाटोदा) याने दिलेल्या फिर्यादीवरून पुणे येथील व्हॉट्सअप ग्रुपमधील बारा जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. पवन पाटील यांनी स्वतःचे फेसबुक अकाऊंट आहे. फेसबुकवर चॅटींगचा खेळ करीत असताना त्यांची मैत्री एका मुलीसोबत झाली. त्यावेळी प्रियांका शहा नावाच्या या मुलीने डॉक्टर पवन यांच्याशी सलगी वाढवित त्यांना आकर्षित केले. तिने सुंदर फोटोद्वारे डॉक्टरला लग्नाचे आमिष दाखविले व आई-वडिल म्हणून इतर लोकांना डॉ. पवन बरोबर फोनद्वारे बोलायला लावले. लग्नाची आमिषे यातच डॉक्टर फसले. तिने डॉक्टरकडे पैशाची मागणी केली. त्यांनी बँक खात्यावर आतापर्यंत २५ लाख रुपये भरले.जेव्हा डॉक्टर संभाव्य पत्नी होणाऱ्या या सुंदर मुलीला भेटण्यास गेले तेव्हा या मुलीने भेट टाळण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर डॉक्टरचा संशय बळावला व फसगत झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी प्रियांका उर्फ अपर्णाने दिलेल्या पत्त्यावर घराचा शोध घेतला असता सत्य समोर आले. अपर्णा उर्फ प्रियांका ही ३५ ते ४० वर्षाची विवाहिता आहे.
याप्रकरणी पुण्यातील अपर्णा संताजी उर्फ सत्यजीत बसवंत हिच्यासह कुणाल गांधी, संताजी बसवंती, सुरेश भोसेकर, भविष्या वाडिया उर्फ पिंकी, एम. वाडिया, दीपिका पंडित, विजू उर्फ राघवेंद्र कटाप, आकाश चव्हाण, गौरी उर्फ रेणुका काकडे, कौशल्य नाईक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. यापैकी तीन जणांना तुळजापूर पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे.

July 19, 2015 in मुख्य पान
 उत्तराखंड प्रकोप- पाऊस, भूस्खलन, भूकंप 0

उत्तराखंड प्रकोप- पाऊस, भूस्खलन, भूकंप

uttarakhand1
डेहराडून- दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे उत्तराखंडमध्ये पर्वत भेगाळल्याने भूस्खलनाचे संकट ओढावले असताना चामोली जिल्ह्याला रविवारी पहाटे भूकंपाचा सौम्य धक्का बसला. यामुळे या भागातील तब्बल १० हजार नागरिकांचा जीव धोक्यात आहे.
उत्तराखंड राज्यातील अनेक परिसरात रविवारी सकाळी भूकंपाचे हल्के धक्के जाणवले. रविवार सकाळी सव्वा पाचच्या सुमारास भूकंपाचे कमी तीव्रतेचे धक्के जाणवले. ज्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.० नोंदविण्यात आली. उत्तराखंडमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र कोठेही जीवित आणि वित्तहानीचे वृत्त नाही.
उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळल्या असून गंगोत्रीकडे जाणारा महामार्ग दरड कोसळल्याने बंद झाला आहे. खबरदारीसाठी राज्य प्रशासनाने भूस्खलन होत असलेल्या भागात मदत व बचाव पथके तैनात ठेवली आहेत.
तांबा खानी भागात १७०० मीटर उंचीवर मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाले आहे. या भागात सातत्याने होत असलेल्या पावसामुळे पर्वताला भेगा पडत आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने उत्तराखंडसह श्रीहेमकुंड साहीब, केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री मध्येही आणखी तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे यात्रेसाठी आलेल्या भाविकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

 

July 19, 2015 in मुख्य पान
 दिल्लीत १६ मुलींची बलात्कारानंतर हत्या 0

दिल्लीत १६ मुलींची बलात्कारानंतर हत्या

download
नवी दिल्ली- दिल्लीत एका २४ वर्षीय नराधमाने तीन महिने ते ६ वर्षे वयाच्या १६ मुलींवर बलात्कार करुन नंतर त्यांची निर्घृणपणे हत्या केल्याची कबुली दिली आहे.
एका सहा वर्षाच्या मुलीवर बलात्कार आणि हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी रविंदर कुमार (२४) याने चौकशी दरम्यान आतापर्यंत १६ मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याची कबुली दिली.
पोलिसांनी बेगमपूर परिसरातून १४ जुलै रोजी रविंदर कुमार याला अटक केली. चौकशी दरम्यान रविंदरने २००९ पासून आतापर्यंत तीन महिने ते ६ वर्षापर्यंतच्या १६ मुलींवर बलात्कार करुन त्यांची हत्या केल्याची कबुली दिली. रविंदर मूळचा उत्तर प्रदेशमधील बदायूं येथील रहिवासी आहे.
रविंदर कुमार याने २००९ ते जून २०१५ या कालावधीत दिल्ली, हरियाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये १६ मुलींवर बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप पोलिसांनी लावला आहे.
रविंदर हा छोट्या मुलींना चॉकलेटचे आमिष दाखवून त्यांना निर्जनस्थळी घेऊन जात असे. व तेथे तो त्यांच्यावर अत्याचार करुन त्यांची हत्या करून मृतदेह कॅनल किंवा शेतात फेकून देत असे.
१४ जुलै रोजी सहा वर्षीय मुलीची बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसांकडे आली. बेगमपुरा भागातून बेपत्ता झालेल्या या मुलीचा मृतदेह एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत आढळून आला. या मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली होती.
या ठिकाणी मिळालेल्या चालक परवान्यावरून पोलिसांनी रविंदर कुमारला अटक केली. त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता या प्रकरणी हा धक्कादायक खुलासा झाल्याचे पोलीस उपायुक्त विक्रमजीत सिंग यांनी सांगितले.

July 19, 2015 in मुख्य पान
 रथयात्रेत चेंगराचेंगरी होऊन 2 ठार, 14 जण जखमी 0

रथयात्रेत चेंगराचेंगरी होऊन 2 ठार, 14 जण जखमी

c_1437229016
पुरी- उडिसामधील पुरी येथे भगवान जगन्‍नाथाच्‍या रथयात्रेत शनिवारी चेंगराचेंगरी झाली असून यामध्‍ये दोन भाविक ठार, तर 14 जण जखमी झाले आहेत. जखमींना कटकच्‍या रूग्‍नालयात दाखल करण्‍यात आले आहे. मृतांमध्‍ये विजयलक्ष्मी मोहंती (वय 65) या महिलेचा समावेश आहे.
या रथयात्रेत भगवान जगन्नाथ, त्यांचे बंधू भालभद्र आणि बहिण सुभद्रा यांचे तीन रथ असतात. भगवान जगन्नाथाचा रथ ओढणाऱ्या भक्तांना पहांडी असे म्हणतात. बाराव्या शतकापासूनची परंपरा असलेल्‍या या रथयात्रेला सकाळी मोठ्या थाटात सुरूवात झाली. लाखो भाविक रथ ओढत तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गुंदिचा मंदिराच्‍या दिशेने निघाले असताना ही चेंगराचेंगरी झाली आहे.

July 18, 2015 in देश-विदेश
देशभरात ईद उत्साहात साजरी 0

देशभरात ईद उत्साहात साजरी

Eid al-Fitr prayers at Delhi
नवी दिल्ली – देशभरात रमजान ईद उत्साहात साजरी होत आहे. मुस्लिम बांधवांनी ईदच्या निमित्ताने एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी ट्विटरवरुन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी तसेच केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही ईदच्या शुभेच्छा दिल्या.
ईदच्या निमित्ताने माझ्याकडून शुभेच्छा असे पंतप्रधानांनी ट्विटरवर म्हटले आहे. ईद उल फित्र च्या निमित्त मी सर्व देशबांधवांना खासकरुन सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनींना शुभेच्छा देतो असे राष्ट्रपतींनी म्हटले आहे.
शुक्रवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर जामा मशिदीचे इमाम बुखारी यांनी शनिवारी ईद साजरी करण्याबाबतची घोषणा केली. देशातील अनेक मशिदींमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाजपठणासाठी गर्दी केली होती. ईद उल फित्र’ निमित्त देशभरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
रमजान हा इस्लामिक चांद्र पंचांगातील नववा महिना आहे. या काळात सूर्योदयापासुन सुर्यास्तापर्यंत उपवास करुन रोजा पाळला जातो. महिनाभर रोजे पाळून इंद्रिये आणि मनावर संयम ठेवण्याचा आणि बंधुत्वाचा संदेश देण्यात येतो.

 

July 18, 2015 in देश-विदेश
कुंभारकिन्ही शिवारात ना. रावते व पालकमंत्री राठोड यांनी केली पेरणी 0

कुंभारकिन्ही शिवारात ना. रावते व पालकमंत्री राठोड यांनी केली पेरणी

_DSC1087
शासन व शिवसेना शेतकऱ्यांना समर्थपणे उभे करणार
यवतमाळ, दि.18 : पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याची अवस्था आणि अस्वस्थता आम्ही समजू शकतो. असे संकटं येतील आणि जातील, परंतु एकदा गेलेला जीव परत येत नाही. त्यामुळे कितीही संकटं आली तरी आत्महत्येचा विचार मनात आणू नका, शासन व शिवसेना पक्ष वैयक्तिकस्तरावर आपल्या सोबत आहे. काय लागेल ती मदत आम्ही करू, असा भावनिक आधार देत, राज्याचे परिवरहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज दारव्हा तालुक्यातील हातणी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी स्व. उत्तमराव चौधरी यांच्या कुंभारकिन्ही शिवारातील शेतात बियाण्यांअभावी रखडलेली पेरणी पूर्ण करून दिली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड हे प्रामुख्याने उपस्थित होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार ना. दिवाकर रावते यांनी अडचणीतील शेतकऱ्यांना विशेषकरून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना ‘पेरते व्हा’ असा संदेश देत त्यांना पक्षातर्फे शेतीसाठी सर्वतोपरी सहाय्य करण्यासाठी अभिनव असे सकारात्मक आंदोलन सुरू केले. 22 जून रोजी यवतमाळ जिल्ह्यातील काही आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या सांत्वना भेटी दरम्यान अनुभवलेल्या शेतकऱ्यांच्या व्यथांनी अस्वस्थ होऊन ना. दिवाकर रावते व पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्ह्यातील जवळपास 3 हजार 500 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शिवसेना पक्षातर्फे शेतीसाठी सर्वेतोपरी सहाय्य करण्याची घोषणा केली. त्यानुसार पालकमंत्री संजय राठोड यांनी कृषी दिनाचे औचित्य साधून 1 जुलै रोजी यवतमाळ नजीकच्या इचोरी येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी अंकूश खडके यांच्या शेतात परेणी करून या उपक्रमाची सुरूवात केली होती. तेव्हापासून जिल्ह्यात शिवसैनिकांमार्फत अनेक शेतकऱ्यांना या प्रकारे मदत सुरू आहे. शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसापर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात दारव्हा तालुक्यातील कुंभारकिन्ही शिवारात आज कापूस दिंडीचे प्रणेते, राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते प्रत्यक्ष सहभागी झाले होते.
हातणी येथील शेतकरी उत्तमराव चौधरी यांनी 2005 मध्ये कर्जबाजारीमुळे आत्महत्या केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असून यावर्षी पैशाअभावी त्यांची कुंभारकिन्ही शिवारातील चार एकर शेती पडीक होती. ही बाब दारव्हा तालुक्यातील शिवसैनिकांना समजताच या कुटुंबाला मदत करण्यासाठी शिवसैनिक सरसावले. त्यानुसार आज दुपारी ना. दिवाकर रावते, ना. संजय राठोड यांच्या उपस्थितीत चौधरी यांच्या शेतात सोयाबीनची पेरणी करण्यात आली. यावेळी मंदा उत्तमराव चौधरी या महिला शेतकऱ्यासह त्यांचा मुलगा संदीप उपस्थित होते. ना. रावते व ना. राठोड यांनी शेतातील दोन तास पेरून दिले. त्यानंतर ना. संजय राठोड यांनी ट्रॅक्टर चालवून पेरणी करून दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना, ना. रावते यांनी, आमचे ‘पेरते व्हा’ हे आंदोलन सकारात्मक स्वरूपाचे असून, अडचणीतील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने त्याच्या घरापर्यंत, शेतापर्यंत जाऊन मदत करण्यासाठी आयोजिलेले आहे. शासन शेतकऱ्यांना मदत करतच आहे, परंतु शिवसेना या पक्षाचीही प्रथम बांधिलकी ही शेतकरी आणि सामान्य माणसांशी आहे. त्यामुळे हे घटक अडचणीत असताना आम्ही स्वस्थ नाही बसू शकत. पक्ष नेतृत्वाच्या आदेशाने आमच्याकडून शक्य ती मदत करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करत आहोत, असे सांगितले. शेतकरी जगाचा पोषिंदा आहे. त्याला तुमची सहानुभूती नको तर, आपल्या पाठीशी खंबीरपणे कोणीतरी उभे आहे, हा विश्वास हवा आहे. तो विश्वास आम्ही त्यांना देत आहो. ‘घार उडे आकाशी, चित्त तिचे पिलापाशी’, ही शिवसेनेची शेतकरी हिताची भूमिका ठरली आहे, असेही ते यावेळी म्हणाले. शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील महिलांना स्वयंनिर्भर करण्यासाठी व उपजिविकेचे कायम साधन मिळावे यासाठी अशा कुटुंबांना लवकरच शेळी, गाय, शिलाई मशीनचे वाटप करण्यात येणार असल्याचे ना. रावते यांनी सांगितले.
शिवसैनिकांनी आमचे पडीक शेत नांगरून, वखरून दिले. पेरणीसाठी बियाणे, खत आणून दिले. बँकेने कर्ज नाकारल्यानंतर शिवसेनेने मदत दिली नसती तर यावर्षी शेती केलीच नसती, अशी प्रतिक्रिया शेतकरी मंदा चौधरी यांनी व्यक्त केली. ना. रावते व ना. राठोड यांनी पेरणी केल्यानंतर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विनोद चव्हाण, सुधाकर सिंगाते, अनिल खडसे यांनी या शेतातील पेरणी पूर्ण करून दिली. या कार्यक्रमात शिवसेना जिल्हाप्रमुखद्वय विश्वास नांदेकर, संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख श्रीधर मोहोड, अरविंद गादेवार, दारव्हा तालुका प्रमुख मनोज सिंगी, दिग्रसचे राजकुमार वानखडे, नेरचे गजानन भोकरे यांच्यासह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक सहभागी झाले होते.
मातोश्रीवरून विचारणा
ना. दिवाकर रावते व ना. संजय राठोड हे कुंभारकिन्ही येथे चौधरी यांच्या शेतात पोहचताक्षणीच मुंबई येथून ‘मातोश्री’वरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ना. रावते यांना फोन आला. यावेळी ना. रावते यांनी चौधरी यांचे शेत पडीक कसे राहिले व आता त्या शेतात शिवसैनिकांच्या वतीने काय काय केले जाणार आहे, याची कल्पना दिली. पलिकडून उद्धव ठाकरे यांनीही संबंधित शेतकरी महिलेची आस्थेवाईपणे विचारपूस करून तिला हवी ती मदत द्या, अशा सूचना ना. रावते यांना केल्या. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ना. संजय राठोड यांच्याशीही संवाद साधून ते करीत असलेल्या उपक्रमाचे कौतूक करीत या उपक्रमात गरजू शेतकऱ्यांच्या मदतीत सातत्य ठेवण्याच्या सूचना केल्या.

 

July 18, 2015 in मुख्य पान
कृषी सप्ताहाच्या माहितीपटाचे आज सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण 0

कृषी सप्ताहाच्या माहितीपटाचे आज सह्याद्री वाहिनीवर प्रक्षेपण

download
यवतमाळ, दि. १८ – राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात साजऱ्या झालेल्या कृषी दिनाच्या विविध कार्यक्रमांसह कृषी सप्ताहातील कार्यक्रमांवर आधारित विशेष माहितीपटाचे प्रसारण डीडी सह्याद्री मराठी वाहिनीवरून उद्या दि. १९ जुलै रोजी होणार आहे. सायंकाळी ७.१५ ते ७.३० या वेळात हा माहितीपट प्रसारित करण्यात येणार आहे. माहितीपटात कृषी दिनानिमित्त पालकमंत्री संजय राठोड यांनी इचोरी येथे शेतात केलेल्या पेरणी व श्रमदानासह, वैद्यकीय महाविद्यालयास कै. वसंतराव नाईक यांचा पुतळा भेट देण्याचा कार्यक्रम तसेच कृषी विभागाच्या वतीने आयोजित कृषी प्रदर्शनासंदर्भात माहिती दाखविण्यात येणार आहे. दूरदर्शनचे प्रतिनिधी आनंद कसंबे यांनी या माहितीपटाचे चित्रिकरण करून निर्मिती केली आहे.

 

July 18, 2015 in मुख्य पान
शेतकऱ्यांना समर्थपणे उभे करणे हेच शिवसेनेचे ध्येय- ना. रावते 0

शेतकऱ्यांना समर्थपणे उभे करणे हेच शिवसेनेचे ध्येय- ना. रावते

_DSC1057
शिवसेनेकडून दारव्हा येथे ६५० कुटुंबांना मोफत बियाणे व खताचे वाटप
यवतमाळ, दि. १८ – समाजाभिमूख आणि सकारात्मक आंदोलनांपासून शिवसेना कधीही दूर जाणार नाही, अशी ग्वाही देत शेतकरी हितासाठी शिवसेनेचे उपक्रम सातत्याने सुरू राहणार आहेत. शेतकऱ्यांना समर्थपणे उभे करणे, हेच शिवसेनेचे पूर्वीपासूनचे ध्येय आहे, असे प्रतिपादन कापूस दिंडीचे प्रणेते, राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी केले. दारव्हा येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबिंयांना मोफत बियाणे व खत वाटपाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. दारव्हा येथील निधी मंगल कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री संजय राठोड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुखद्वय विश्वास नांदेकर, संतोष ढवळे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. रावते म्हणाले की, पावसाअभावी राज्यातील शेतकरी भीषण संकटातून जात आहे. अनेक ठिकाणी पेरणी उलटली, पावसाअभावी पिके करपत आहेत. दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. अशा स्थितीत आपल्या पाठीमागे कोणाचीतरी भक्कम साथ शेतकऱ्यांना हवी आहे, आणि ‘पेरते व्हा’ या आंदोलनाच्या माध्यमातून शिवसेना त्यांच्या सोबत आहे, हेच सांगायला मी आज येथे आलो आहे, असे ते म्हणाले. प्रथम शेतकरी हित ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे. पक्षनेतृत्वाच्या भूमिकेला अनुसरूनच राज्यातील शिवसैनिक शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी परिश्रम घेत असल्याचे त्यांनी सांगितले. आत्महत्या करू नका एवढीच कळकळीची विनंती मी शेतकऱ्यांना करतो, अशी भावनिक सादही ना. रावते यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना घातली.
याप्रंसगी बोलताना पालकमंत्री संजय राठोड यांनी, जिल्ह्यात १ जुलैपासून शिवसेनेच्या वतीने आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना शेतीसंदर्भात सर्वतोपरी मदत करण्याचा उपक्रम सुरू असल्याचे सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यातील ६० च्या वर शेतकऱ्यांना शिवसैनिकांनी पेरणी करून दिली आहे. शिवसेना सत्तेत नव्हती तेव्हाही, आणि आता सत्तेत असतानाही कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. मात्र संकटकाळात शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा पर्याय निवडून कुटुंबाला उघड्यावर पाडू नये, असे आवाहन ना. संजय राठोड यांनी केले.
आजच्या कार्यक्रमात दारव्हा, दिग्रस, नेर तालुक्यातील ६५० शेतकऱ्यांना सोयाबीन, तूर बियाण्यांचे व एसएसपी खताचे वाटप करण्यात आले. यावेळी ना. दिवाकर रावते व ना. संजय राठोड यांच्या हस्ते लक्ष्मी धुरट, माया चव्हाण, कमला राठोड, अनंत राऊत, कमला भोकरे, सतवा चव्हाण, शांता शेरे आदी शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना बियाणे व खतांचे वाटप केले. शिवसेनेतर्फे सर्व शेतकऱ्यांच्या घरी हे बियाणे पोहचवून देण्यात आले. कार्यक्रमात तूर, सोयाबीन व खताच्या प्रत्येकी ६५० बॅग वाटप करण्यात आल्या. या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्रीधर मोहोड, प्रवीण शिंदे, अरविंद गादेवार, उमाकांत पापीनवार, राजेंद्र साकला, तालुका प्रमुख मनोज सिंगी, राजकुमार वानखडे, गजानन भोकरे, शहर प्रमुख सुधीर दातीर, संजय चोपडे, रवींद्र भारती, मनोज ढगले, पंडीत राठोड, महिला आघाडी प्रमुख लता चंदेल, जि.प.सदस्य संगीता इंगोले, पं.स.सदस्य माणिक मेश्राम, महिला आघाडीच्या जयश्री मिरासे, साधना वाणी, आशा डोंगरे, विद्यार्थी सेनेचे जिल्हाप्रमुख राजू दुधे, गजेंद्र चव्हाण, धनंजय सारखे, रवी तरटे आदी शिवसेना पदाधिकारी, शेकडो शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अजय गाडगे यांनी केले.

 

July 18, 2015 in विदर्भ
पुण्यात कॉकटेल पार्टी, 50 मद्यधुंद तरुण-तरुणी अटकेत 0

पुण्यात कॉकटेल पार्टी, 50 मद्यधुंद तरुण-तरुणी अटकेत

party1_1437201340

पुणे- पुण्यातील आयटी पार्क परिसर म्हणून वेगाने विकसित झालेल्या हिंजवडीजवळील नेरे गावात एका बांधकाम व्यावसायिकाच्या फॉर्म हाऊसवर कॉकटेल रंगलेल्या पार्टीवर पोलिसांनी छापा टाकला. नेरे गाव हे हिंजवडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोडते. हिंजवडी पोलिसांनी या पार्टीची कुणकुण लागताच मध्यरात्री 3 च्या सुमारास धाड टाकली. यावेळी 40-50 तरूण-तरूणी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. दारूच्या बाटलीचा खच व काही कंडोम्सची पाकिटे मिळून आल्याचे हिंजवडी पोलिसांनी दावा केला आहे.

यात काही महाविद्यालयीन तरूण-तरूणी आहेत तर काही आयआयटीन्स आहेत. पुणे शहरातील एका प्रतिष्ठीत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा या पार्टीत सहभाग असल्याचे समोर आले आहे. या सर्व तरूण-तरूणींना पिंपरीतील वायसीएम रूग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले आहे. दरम्यान, या पार्टीत ड्रग्जचा वापर करण्यात आला आहे काय याचा तपास पोलिस करीत आहेत. या कॉकटेल पार्टीसाठी परवानगी घेतली नसल्याचे हिंजवडी पोलिसांनी सांगितले.

July 18, 2015 in मुख्य पान
 आता इंजेक्शन न टोचता घेता येईल लस 0

आता इंजेक्शन न टोचता घेता येईल लस

17072015-md-am-9-17962-1-large
इंजेक्शन टोचून घ्यायचे म्हटले की, लहान मुलेच नाही तर मोठय़ांचेसुद्धा हातपाय थरूथरू लागतात. म्हणूनच बर्‍याचदा इंजेक्शनऐवजी गोळ्यांची मागणी केली जाते. मात्र या समस्येवरचा उपाय शास्त्रज्ञांनी शोधून काढला आहे. त्यांनी एक अतिशय सूक्ष्म सुई असलेली पट्टी विकसित केली असून ती त्वचेमध्ये सहजपणे मिसळून जाईल. जपानच्या ओसाका विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी या अनोख्या प्रकारची पट्टी तयार केली असून वेदनादायी इंजेक्शनला ती पर्याय ठरेल, असा त्यांचा दावा आहे. त्वचेमध्ये मिसळणारी ही पट्टी लसीकरण अधिक सोपे, सुरक्षित आणि कमी वेदनादायी बनविण्यास सक्षम आहे. बहुतांश लस सुईच्या मदतीने त्वचा वा स्नायूंमध्ये दिल्या जातात. ही पद्धत प्रभावी असली तरी त्यासाठी व्यक्ती धिराची व दक्ष असणे गरजेचे असते. कारण सुई घेण्याच्या नावानेच अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो. मात्र ही नवी सूक्ष्म सुई असलेल्या पट्टीला विरघळणार्‍या पदार्थांपासून बनविण्यात आली आहे. त्यामुळे तिच्यामध्ये सुईशी संबंधित कोणत्याही धोक्याची शक्यता नाही. या पट्टीचा वापर करण्यासाठी वैद्यकीय दक्षतेचीही गरज नाही. या संशोधनाचे प्रमुख शिंसाकू नकागावा यांनी सांगितले की, या पट्टीची सुगमता पाहता लसीकरणाला चालना देण्यासाठीही तिचा वापर केला जाऊ शकेल.

अरेच्चा! मातीशिवाय शेती! 0

अरेच्चा! मातीशिवाय शेती!

17072015-md-ng-7-5269-3-large
महाराष्ट्रातील काही ठिकाणीही या तंत्रज्ञानाद्वारे जनावरांसाठी पोषक चार्‍याचे उत्पादन घेतले जाते.?लंडन : अद्ययावत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मातीशिवाय केवळ पाण्यावर स्ट्रॉबेरी उत्पादनाचा महाप्रकल्प ब्रिटनमधील शेतकर्‍यांनी यशस्वी करून दाखविला असून, या प्रकल्पातून आतापर्यंत तब्बल ७५ हजार टन स्ट्रॉबेरीचे उत्पादनही घेण्यात आले आहे.
जमिनीवर उत्पादन घेण्याच्या पारंपरिक पद्धतीत मजुरांना खाली वाकून स्ट्रॉबेरीची तोडणी करावी लागते. यामुळे त्यांना पाठदुखी व अंगदुखीसारखा त्रास होतो. यावर हा अनोखा उपाय शोधत जवळपास पाच फूट उंचीवर लटकाविलेल्या ट्रेमध्ये स्ट्रॉबेरीचे उत्पादन या शेतकर्‍यांनी यशस्वी करून दाखविले आहे. विशेष म्हणजे यासाठी मातीचा अजिबात वापर करण्यात आलेला नाही. विशालकाय ट्रेमधील पाण्यावरच या स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेण्यात आले आहे. पिकाला पाण्याद्वारेच अन्नद्रव्यांचा पुरवठा करून शेतकर्‍यांनी हा प्रयोग यशस्वी करून दाखविला आहे. या अद्ययावत तंत्रज्ञानामुळे मजुरांना उभ्यानेच स्ट्रॉबेरीची तोडणी करता येते. शिवाय पिकाच्या गरजेनुसार हवामानही या प्रकल्पात नियंत्रित केले जाते. ब्रिटनच्या ससेक्स प्रांतात १६ एकरावर उभारण्यात आलेल्या या महाकाय प्रकल्पातून स्ट्रॉबेरीचे विक्रमी उत्पादन सध्या घेतले जात आहे. पाण्यावर पीक उत्पादन घेण्याच्या या तंत्रज्ञानास हायड्रोपोनिक्स असे म्हणतात.

July 18, 2015 in मुख्य पान

खंडाळा येथे गुप्तधन सापडल्याची अफवेने खळबळ

आर्णी – घरातील भुयाराचे जागेत खोदकाम करुन गुप्तधन काढल्याचे अफवेने खंडाळा येथे चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना ताब्यात घेऊन प्रतिबंधात्मक कारवाई केली. खंडाळा येथे रात्री ९ वाजताच्या दरम्यान एका पोलीस पाटाच्या घराच्या आवारात खोदकाम सुरू आहे. यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात गुप्तधन सापडल्याची माहीती गावातील नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यावरुन डीबी पथकाने घटनास्थळ गाठुन भुयारा जवळ सात ते आठ फुट खोल खोदकाम करुन असल्याचे दिसले. तसेच पुजापातीचे सामान व सात ते आठ जण यावेळी पोलिसांना आढळले. त्यांनी या सर्वांना ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. रात्री व सकाळी त्यांची कसून चौकशी करून ठाणेदारांनी घटनास्थळाची पाहणी केली. मात्र पोलिसांच्या हाती काहीच लागले नाही. या प्रकरणी पोलिसांनी आठ जणाविरुद्घ प्रतिबंधात्मक कारवाई केली. सध्या खंडाळा गावात ग्रामपंचायत निवडणूक असल्याने विरोधकांनी अफवा परसवून पोलीसांना माहिती दिल्याचे त्या पाटलाचे म्हणने आहे. डीबी पथकाने गुप्तधन प्रकरणातही पाटलावर दबाव टाकुन मोठी डील केल्याची चर्चा आहे.

July 12, 2015 in मुख्य पान

शेतकºयाची आत्महत्या

पांढरकवडा – निसर्गाच्या लहरिपणामुळे तालुक्यातील वाढोडा येथील शेतकºयाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज रविवारी ११ जुलै रोजी दुपारी २ वाजता घडली. शालीक चंपत गेडाम (४१) रा. वाढोडा असे मृतकाचे नाव आहे. गेडाम यांच्या वडीलाच्या नावे गट नं. २९/११ मध्ये ०.०२ हेक्टर आर जमीन आहे. त्याचेवर अडणी येथील सोसायटीचे १० हजार ८७६ रुपये कर्ज आहे. मृगनक्षत्रात पाऊस बरसल्याने शेतकºयांनी शेतात बियाणे लागवड व पेरणी केली होती. मात्र तब्बल २० दिवसापासून पावसाने दडी मारल्याने शेतातील पिक करपल्याने दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. त्यामुळे गेडाम सतत विवंचनेत राहत होता. दरम्यान दोन दिवसापासून तो घरुन बेपत्ता झाला होता. नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली असता शेतात गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. त्याच्या मागे पत्नी, तीन मुली, १ मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे. याप्रकरणी मृतकचे जावाई सुरेश महादेव मेश्राम रा. सायखेडा यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.

 

July 12, 2015 in विदर्भ

बंधाºयात बुडून बालकाचा मृत्यू

नेर – पोहायला गेलेल्या बालकाचा बंधाºयात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज रविवारी ११ जुलै रोजी दुपारी ३ वाजता घडली. पियुष गजानन शिंदे (१३) रा. खरडगाव असे मृतकाचे नाव आहे. शाळेला सुट्टी असल्याने आज रविवारी तो आपल्या मित्रासोबत बंधाºयात पोहायला गेला होता. अशातच त्याचा पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. या बाबतची माहिती त्याच्या मित्रांनी गावकºयांना दिली. या घटनेची माहिती मिळताच नेर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह बाहेर काठून उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. यापूर्वी अजंती येथे बंधाºयात बुडून एका बालकाचा मृत्यू झाला असून ही दुसरी घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून गावात हळहळ व्यक्त होत आहे.

July 12, 2015 in मुख्य पान