मुंबई – मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणा-या सुरक्षा व्यवस्थेबद्दल काही महत्वाचे चांगले निर्णय घेतले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलिसांना वर्षा बंगल्यावरील आणि सुरक्षा ताफ्यातील अतिरिक्त कर्मचारी वर्ग कमी करण्याचे निर्देश दिले आहेत.मुख्यमंत्र्यांना झेड प्लस सुरक्षा कायम रहाणार आहे. मात्र बंगल्यातील आणि सुरक्षेवरील अतिरिक्त कर्मचारी वर्ग कमी करण्यात येणार आहे.तसेच मुख्यमंत्र्यांनी यापुढे प्रतिष्ठेचा समजला जाणारा लाल दिवा न वापरण्याचा निर्णय घेतला आहे तसे त्यांनी अधिका-यांना निर्देश दिले आहेत.









