अधिवेशन संपेपर्यंत शेतकऱ्यांना मदत जाहीर करू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

images
मुंबई – अगोदरच दुष्काळ आणि त्यात अवकाळी पावसाने झोडपल्याने राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांनी हा फटका सहन न झाल्याने आत्महत्या केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना भरघोस मदत देण्यात यावी यासाठी विरोधकांनी विधानसभेत गोंधळ घातला. यावेळी शेतकऱ्यांना अधिवेशन संपेपर्यंत मदत जाहीर करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.त्यामुळे सरकार किती रुपयांची मदत जाहीर करते, याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 × = seventy two