मुंबई- महाराष्ट्र विधिमंडळाच्या अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सोमवारी सकाळी ११ वाजता सुरूवात झाली. पहिल्याच दिवशी सरकारला धारेवर धरण्यासाठी सर्व विरोधक एकत्र आले आहेत.भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी विधानभवनाच्या पाय-यांवर सरकारविरोधात निदर्शने केली. टोल बंद करा, आदर्श अहवालातील दोषी आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या मंत्र्यांवर कारवाई करण्याच्या घोषणा विरोधकांनी दिल्या. राज्यपालांचे अभिभाषण सुरु असतानाही विरोधकांनी गोंधळ घातला.
महत्त्वाची १२ विधेयके होणार सादर
या अधिवेशनात महत्त्वाची १२ विधेयके सादर केली जाणार आहेत. त्यात महाराष्ट्र सावकारी विधेयक, ग्रामपंचायत सुधारणा विधेयक, पोलिस बदल्या, अस्थापने मंडळे याबाबत तरतूद करणारे सुधारणा विधेयक, पुरवणी विनियोजन विधेयक (२०१४), विनियोजन लेखानुदान विधेयक सादर केली जाणार आहेत.









