
पालघर – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर शनिवारी सकाळी कारला झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.
सकाळी साडे अकराच्या सुमारास मुंबई-अहमदाबाद मार्गावरील मेदवान खिंड भागात हा अपघात घडला. अपघातात मृत झालेल्या या व्यक्ती एकाच कुटुंबातील होत्या. पुणे शहरातील ते रहिवासी होते. तर गंभीर जखमी झालेल्या व्यक्ती मुंबईतील रहिवासी आहेत.
अपघातातील जखमींना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटली नसून त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.









