महागाव – तालुक्यातील कासारबेहळ येथून मुळावा येथे लग्नासाठी जाणाºया पाटे कुटुंबीयांच्या दुचाकीला कन्टेनरने धडक दिल्याची घटना आज रविवारी सकाळी येथून दोन किंमी अंतरावरील हनुमान मंदिराजवळ घडली. यामध्ये तिन जण जागीच ठार तर मुलगा गंभीर जखमी झाला. यावेळी या मार्गावरील वाहतूक ३ तास ठप्प झाली होती़
कासारबेहळ येथील शेतकरी दिगांबर रासाजी पाटे (३४), पत्नी सवीता दिगांबर पाटे (२८), मुलगी गायत्री दिगांबर पाटे (१०), मुलगा राहुल दिगांबर पाटे (८) हे आपल्या दुचाकी क्ऱ एमएच २९ एक्स ९१४५ ने मुळावा येथील लग्नाला जात होते़ महागाव पासून २ कि़मी़ अंतरावर असलेल्या हनुमान मंदिरा जवळील वळणावर येताच उमरखेड कडून आलेल्या कन्टेनरने (एम.एच. ३४/एम.९४६७) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात दिगांबर, त्याची पत्नी सवीता व मुलगी गायत्री पाटे हे जागीच ठार झाले. तर मुलगा राहुल गंभीर जखमी झाला आहे़ अपघातानंतर कंनटेनरने दिड किमी अंतरापर्यंत दुचाकी घासत नेली. यावेळी चालकाने ट्रक सोडून पोबारा केला. दरम्यान याच कनटेनरने वºहाडा घेऊन जाणाºया एक ट्रकलाही धडक देण्याचा प्रयत्न केला़ या घटनेची माहिती मिळताच महागाव पोलीसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविछेदनासाठी ग्रामिण रुग्णालय सवना येथे पाठविले. तर जखमी राहुल याला नांदेड येथे उपचारासाठी दाखल केले. यावेळी राज्य मार्ग क्र. तीनवरील संपूर्ण वाहतुक तीन तास खोळंबली होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल नरवाडे यांनी जखमीच्या उपचारासाठी मदत केली. या अपघातामुळे कासारबेळ सह तालुक्यात शोककळा पसरली आहे़या प्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.










