अपघातात तिन ठार

यवतमाळ – जिल्ह्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये तीन जण ठार झाल्याच्या घटना शुक्रवारी घडल्या. दौलत तुकाराम नेवारे (४५) रा. देवी नगर लोहारा हे आपल्या दुचाकीने(एम.एच. २९/एफ ५९४९) इचोºयावरुन जात होते. अशातच दुचाकी भरधाव व निष्काळजीपने चालवुन वाहन रस्त्यावर आदळले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीकृष्ण जागोजी भोंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन लाडखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. भानुदास चोपने रा. वरध अपार्टमेंन्ट वणी हे वरोरा रोडवर उभे होते. अशातच भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (एम.एच. २९ टि ९२४) जोरदार धडक दिल्याने चोपने जागीच ठार झाले. या प्रकरणी वणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तर चारगाव चौकीजवळ अज्ञात वाहनाने धडक दिल्याने रविंद्र नटकडे रा. शिरपूर हे जागीच ठार झाले. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी वाहन चालकाविरुद्घ गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 7 = one