अपघात, सहा ठार

3 4 1 217
परभणी येथील घटना, उमरखेड मध्ये शोककळा
उमरखेड – लग्न सोहळा आटोपून परभणीवरून उमरखेड कडे परत येत असताना विरुद्घ दिशेने येणाºया वाहनाची समोरासमोर धडक झाली. ४ फेबु्रवारी रोजी रात्री १२. ३० वाजता परभणी येथून १५ किमी अंतरावर झिरो फाट्याजवळ झालेल्या अपघातामध्ये सहा जण जागीच ठार झाले. यामध्ये बंग कुटुंबातील दोन, दुकानातील मुनीम, अकोला येथील पाहुणा व अन्य दोन जणांचा समावेश असून शहरात शोककळा पसरली आहे.
शहरातील कापड व्यावसायीक भगवान बंग यांच्या मुलांचा विवाह परभणी जवळील सेलु ह्या ठिकाणी ४ फेबु्रवारी रोजी होता. लग्न सोहळा आटोपल्यानंतर काही वºहाडी एम.एच. २९ आर ६२३८ क्रमांकाच्या कु्रझरने उमरखेडकडे निघाले होते. यावेळी चालक यादव गायकवाड हा वाहन चालवित असताना विरुद्घ दिनेशने येणाºया एम.एच. २६ / एडी ०९८८ क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्ये क्रुझर संपूर्णपणे क्षतीग्रस्त झाल्याने वाहनात बसून असलेले हरिष बंग (६०), जगदिश बंग (५८), दामोधर सारडा (५८), रामचंद्र भराडे (६५) रा. उमरखेड, रामकिशोर लोहीया (५०) रा. अकोला, रामदास सुरोशे (४२) रा. नागेशवाडी हे सहा जण जागीच ठार झाले. तर दिनेश तेला,यादव गाकवाड हे जखमी झाले असून काही जण किरकोळ जखमी झाले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. घटनेतील एक जण नागेशवाडी येथील असल्याने तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तर शहरातील चार जणावर हिंन्दु स्मशानभूमित अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शहरातील व्यापाºयांनी आपली प्रतिष्ठाणे संपूर्णपणे बंद ठेऊन शोक व्यक्त केला. या दुदैवी घटनेने शहरात शोकाकुल वातावरण पसरले होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


one + 6 =