
नवी दिल्ली- घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त, केंद सरकारने १४ एप्रिल रोजी देशभर सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
गुरुवारी ही घोषणा करण्यात आली. यामुळे देशभरातील व्यापारी आणि औद्योगिक कारखान्यांसह केंद्र सरकारच्या ५० लाख सरकारी कर्मचा-यांना सोमवारी सुट्टी मिळणार आहे.
केंद्र आणि दिल्ली राज्य सरकारने यापूर्वीच आज मतदान करण्यासाठी सुट्टी जाहीर केली. तर पुढच्या आठवड्यात या कर्मचा-यांना तीन दिवस सुट्टी मिळणार आहे. शुक्रवार १८ एप्रिल रोजी ‘गुड फ्रायडे’ निमित्त सुट्टी आहे.









