आचार संहितेचे कटाक्षाने पालन करा – जिल्हाधिकाºयांचे निर्देश

यवतमाळ – निवडणूक आयोगाने लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१४ ची घोषणा केली आहे. या निवडणूक कालावधीसाठी आदर्श आचार संहिता जारी करण्यात आली आहे. या आचार संहितेमधील मार्गदर्शक तत्वांचे सर्वांनी कटाक्षाने पालन करावे. असे निर्देश जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज संबंधित अधिकाºयांना दिलेत. निवडणूक कालावधीमध्ये आचार संहितेचे उल्लंघन होवू नये तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात ३ ते ४ भरारी पथकांची, बैठे पथकांची स्थापना करण्यात येत आहे.
यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाची निवडणूक १० एप्रिल रोजी होत असून १६ मे रोजी मतमोजणी होणार आहे. या काळात आचार संहिता लागू झाली आहे. याच पाश्वर्भुमिवर जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी आज गुरुवारी निवडणूकीसंबंधी असलेले नोडल आॅफीसर तसेच जिल्हास्तरीय अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी मुख्य कायर्कारी अधिकारी मल्लीनाथ कलशेट्टी, अतिरीक्त जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, उपविभागीय अधिकारी भागवत डोईफोडे, आदींची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक आयोगाने निवडणूक प्रक्रियेमध्ये अनेक परिवर्तन केल असून लोकसभा निवडणुकीत उमेदवारांच्या खर्चावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येत आहे. मतदारांनी निर्भय व नि:पक्षपातीपणे मतदान करण्यासाठी पुढे आले पाहिजे यादृष्टीने जिल्ह्यात मतदार जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आला. परिणामी १ लाख २३ हजार नवीन मतदारांची भर पडली. निवडणूक कालावधीमध्ये आचार संहितेचे उल्लंघन होवू नये तसेच गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदार संघात ३ ते ४ भरारी पथकांची, बैठे पथकांची स्थापना करण्यात येत आहे. उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी करण्यासाठी लेखा तपासणी चमू प्रत्येक पथकासोबत राहणार आहे. कोठेही गैरप्रकार निदशर्नास आल्यास त्याचा पंचनामा व व्हिडीओग्रॉफीद्वारे चित्रीकरण करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत नोडल आॅफीसर, सेक्टर आॅफीसर, व अन्य संबंधित अधिकाºयांनी दक्ष रहावे. अशा सुचनाही जिल्हाधिकाºयांनी यावेळी केल्या. आचार संहितेच्या अनुषंगाने सरकारी कार्यालयाच्या, नगर पालीकेंच्या अधिकारातील होर्डिंगचा जाहिरातीसाठी वापर होवू नये याची काळजी घेण्यात यावी. निवडणुकीसाठी अधिग्रहित करण्यात येणारी वाहने सुस्थितीत पाठवावी. ज्या कार्यालयांनी निवडणूक कामासाठी कमर्चाºयाची यादी अद्याप सादर केली नाही ती यादी तात्काळ सादर करण्यात यावी. कोणत्याही अधिकारी कमर्चाºयास दिघर्काळासाठी रजा मंजूर करु नये,पुर्व परवानगी शिवाय मुख्यालय सोडू नये असेही जिल्हाधिकाºयांनी यावेळी सांगितले. या बैठकीत अतिरीक्त जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे यांनी आचार संहितेबाबत माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four + = 6