
यवतमाळ, दि. 8 : भारतीय हवामान खात्याने दिलेल्या सूचनेनुसार विदर्भातील सर्वच जिल्ह्यामध्ये दिनांक 8 ते 10 मार्च दरम्यान गारपीटीसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण विदर्भासह संपूर्ण मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात गारपीटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. खबरदारी म्हणून नागरिकांनी गारपीट सुरु असतांना बाहेर जाण्याचे टाळावे, यादरम्यान दुभती तसेच इतर जणावरे सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, शक्य असल्यास ज्या धान्यांची कापणी झालेली आहे. ते धान्य सुरक्षित ठिकाणी हलवावे. गारपीटीनंतर तापमाणामध्ये घट होण्याची शक्यता असल्याने थंडीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. गारपीट सुरु असतांना विजेच्या तारा कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळे वीज तारांपासून दूर रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.









