आत्महत्येचा प्रयत्न गुन्हा नाही

12-Dark_wallpapers1

नवी दिल्ली दि. १० ( प्रतिनिधी)  – आत्महत्येच्या प्रयत्नाला गुन्ह्यांच्या श्रेणीतून लवकरच हटवण्यात येणार आहे. विधी आयोगाने केलेल्या शिफारसीनुसार केंद्रातील मोदी सरकारने आयपीसी कलम ३०९ (आत्महत्येचा प्रयत्न) रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. आयीपीसीच्या कलम ३०९ नुसार आतापर्यंत आत्महत्येच्या प्रयत्न हा गुन्हा ठरत असल्याने संबंधिताला एक वर्षाची शिक्षा आणि दंड आकारण्याची तरतूद आहे.
१८ राज्य आणि ४ केंद्र शासित प्रदेश कलम ३०९ रद्द करण्याच्या बाजूने आहेत. राज्यांनी दिलेल्या सहमतीमुळे केंद्र सरकराने कलम ३०९ आयपीसीतून हटवण्याचा निर्णय घेतल्याचं गृहमंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. आत्महत्येच्या प्रयत्नाला मानवतेच्या दृष्टीकोनातून बघावं आणि गुन्ह्यांच्या श्रेणीतून ते हटवलं गेलं पाहिजे, अशी शिफारस विधी आयोगाने आपल्या अहवालातून सरकारला केली होती, अशी माहिती केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी ऑगस्टमध्येच लोकसभेत दिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


one × 9 =