
यवतमाळ, दि. ११ – आदिवासींना घटनात्मक मिळालेल्या आरक्षणाला धक्का लावू नये, घटनेने ७.५ टक्के आरक्षण आदिवासींना दिले असून कोणत्याही राजकारणकत्र्यांनी मतांसाठी लहरीपणाने वागून आदिवासीच्या आरक्षणात फेरबदल करु नये, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरुन आंदोलन करु, असा इशारा आज विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दिला.
१ लाख ४५ हजार लोकांनी बोगस जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे आदिवासी बनवून आदिवासींच्या नोकºयावर डल्ला मारला आहे. २००१ मध्ये कायदा बनला होता की, बोगस आदिवासीचे जातीचे प्रमाणपत्र देणे किंवा घेणे यात दोन वर्षाची शिक्षा झाली पाहिजे, असा कायदा करण्यात आला होता. पण या कायद्याचा दुरुपयोग करण्यात आला. यास शासनाने काढलेला जी.आर. कारणीभुत ठरला आहे. तो निघालेला जी.आर. रद्द करण्याची मागणी आहे. पुर्वी आदिवासी कॅटीगिरीमध्ये ४७ जातींचा समावेश होता. पण त्यापैकी दोन जाती काढून टाकण्यात आल्या. १५ वर्षे सत्तेत असूनसुध्दा हा बोगस जी.आर. आम्हाला रद्द करता आला नाही, त्याचे मोठे कारण म्हणजे पदावर बसलेले राजकर्ते आणि अधिकारी यास यांचा विरोध होता. कोणला कीतीही आरक्षण द्या, पण आमच्या आदिवासींच्या ७.५ टक्के आरक्षणाला हात लावू नये, असे वसंतराव पुरके यांनी विश्रामगृह येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.









