आरजेडी’च्या १३ आमदारांचे राजीनामे

नवी दिल्ली- राष्ट्रीय जनता दलाच्या बिहारमधील १३ आमदारांनी सोमवारी राजीनामे दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या आमदारांचा राजीनामा पक्षाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
पक्षातील या १३ आमदारांनी सोमवारी विधानसभेचे अध्यक्षांकडे राजीमाने सोपवले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे आमदार ‘जेडीयू’मध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. मात्र या राजीनामा नाट्यावर अद्याप कोणाही अधिकृत माहिती दिलेली नाही.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षातील १३ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. हे सर्वजण बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या ‘जेडीयू’मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. बिहार विधानसभेच्या २४३ सदस्यांमध्ये आरजेडीचे २२ आमदार आहेत. त्यामुळे १३ जणांनी राजीनामे दिल्यामुळे पक्षाकडे केवळ नऊच आमदार शिल्लक राहिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


five × 6 =