यवतमाळ,दि. २२ – केंद्र सरकारद्वारा अरूण जेटली यांनी मांडलेला अर्थसंकल्प हा बहुजन हिताय नसल्याचा आरोप करून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने अर्थसंकल्पाची होळी केली.
काँग्रेससह सर्वच विरोधी पक्षासह सत्ताधारी भाजप बहूजन समाज विरोधी भूमिका घेत असल्याचा आरोप बहुजन मुक्ती पार्टीने केला आहे. सरकारने सबसीडी,जीडीपी दर २.१ काडून १.७ ठेवला आहे. त्यातही कपात केली असून कुटूंब नियोजन ५५१० कोटीची तरतुद गेल्यावर्षाच्या तुलनेत कमी केली. दारीद्रय निर्मुलन व गृहनिर्माण गरीब वस्ती ३९४ कोटी कपात केली. आदिवासी उत्थानाच्या रक्कमेतून ५०० कोटींची कपात केली. अनुसुचित जातीच्या योजना खर्चात १२,००० कोटीची कपात केली आहे. त्यामुळ हा अर्थसंकल्प बहुजन हिताय नसल्याचा आरोप करून आज आर्णी येथील शिवनेरी चौकात अर्थसंकल्पाची होळी केली. यावेळी गजानन गोडवे, उमेश घायवट, सैयद मुजफ्फर, कृष्णा सोळंके, फकीरा बेडके, उस्मान शेख, रूपेश राऊत, मधुकर हरकरे, अमोल खडसे, राहुल मुनेश्वर, आसीफ माकोडे, सुनील रसाळ, प्रकाश वरटकर, अमजद पठाण, सुरेश मडावी सहभागी झाले होते.










