आर्णीत शेतकºयांचा रास्ता रोको , कापूस खरेदी बंद ठेवल्याने उद्रेक

IMG-20150120-WA0041_resized
यवतमाळ , दि. २० – कापूस पणन महासंघाने कापूस खरेदी बंद ठेवल्याने शेतकºयांच्या संतापाचा उद्रेक झाला. कापूस खरेदी सुरू करा या मागणीसाठी संतप्त शेतकºयांनी आर्णी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती यार्डसमोर आर्णी-यवतमाळ मार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक खोळंबली होती.
कापूस पणन महासंघाने १ जानेवारीपासून संपूर्ण कापूस खरेदी बंद केली होती.दरम्यान सोमवार १९ जानेवारीपासून आर्णी येथील महालक्ष्मी जिनींगमध्ये कापूस खरेदी सुरु केली. पहिल्याच दिवशी ४०० शेतकºयांनी भाड्याने वाहन घेऊन कापूस विक्रीसाठी आणला होता. त्यापैकी १०० वाहनातील कापसाची खरेदी करण्यात आली. उर्वरीत वाहनाचे मोजनमाप न झाल्याने यार्डात उभी होती. त्यामुळे संतप्त शेतकºयांनी कापूस खरेदी सुरू करावी या मागणी करीता बाजार समितीच्या यार्ड समोर आर्णी- यवतमाळ मार्गावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले. या मोर्चाचे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य प्रविण शिंदे, बाजार समितीचे सभापती जिवन जाधव यांनी केले. या मोर्चाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून शेतकºयांसोबत चर्चा केली. यावेळी शेतकºयांनी कापूस खरेदी सुरू करावी अशी मागणी केली. तसेच कापसाला ४ हजार ५० रुपये भाव जाहीर केल्यानंतर जीनींगने ३हजार ९५० रुपये भाव देण्यात आल्याने रोष व्यक्त केला. यावेळी शिंदे यांनी कापूस पणन महासंघाच्या अधिकाºयांसोबत चर्चा केली. त्यानंतर आर्णी येथील उर्वरीत तीन्ही जिनींग सुरू केले असून सर्व शेतकºयांच्या कापूस खरेदी करण्याचे आश्वासन दिले. या आंदोलनाने आर्णी- यवतमाळ मार्गावरील वाहतुक एक तास ठप्प होती. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven + 1 =