आर्णी बालाजी जिनींग, कापूस खरेदीतील काट्यात घोळ

2014-11-17~cottonproduction_ns
यवतमाळ – आर्णी येथील बालाजी जिनींगमध्ये कापसाची खाजगी खरेदी सुरू  असून काट्यात घोळ असल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संचालकाविरूद्घ फसवणुकीचे गुन्हे दाखल केले आहे. हा प्रकार गंभीर असून शेतकºयामध्ये रोष व्यक्त होत आहे.
देऊरवाडी येथील शेतकरी तथा माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर डकरे यांनी एम.एच. २९ / ६३३७ क्रमांकाच्या ट्रॅक्टरमध्ये घरून कापूस भरला. त्यानी गायत्री काट्यावर वजन करून कापूस बालाजी जिनींगमध्ये विकण्यासाठी नेला. त्यावेळी ट्रॅक्टरसह ७०.३० क्विंट कापूस भरला. त्यामध्ये निव्वळ कापसाचे वजन ३५.७५ क्विटल भरले. गायत्री काट्यावर ट्रॉलीसह ७०.६५ व निव्वळ कापसाचे वजन ३५.९५ क्विंटल भरले. दोन्ही काट्यापैकी बालाजी जिनींगमध्ये २० किलो वजन कमी आढळून आले. यापूर्वीही याच शेतकºयाने सदर जिनींगमध्ये कापूस विक्री केली आहे. येथे वजनात घोळ असल्याच्या तक्रारी होत्या. मात्र हा घोळ कुणीही पुढे आणत नव्हते. आज डकरे यानी हा प्रकार उजेडात आणला. यावेळी महादेव बुटले, रामचंद्र जाधव, पंजाब जाधव आदी शेतकरी उपस्थित होते. शेतकरी अगोदरच आस्मानी संकटाला तोंड देत आहे. कापूस पिकला नाही, शेतकºयाच्या कापसाला भाव नाही, जो माल हाती आला त्यातही व्यापारी शेतकºयाची फसवणूक करीत आहे. याप्रकरणी आर्णी पोलिसांनी बालाजी जिनींग अ‍ॅन्ड प्रेसींगचे संचालक दिलीप चिंतावार, बाळासाहेब निलावार यांचे याचे विरुद्घ फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 5 = zero