यवतमाळ – शेतीच्या हिस्सेवाटणीवरून तीन जणांनी कुºहाडीने वार करून एका युवकाचा खून केल्याची घटना आज मंगळवारी सकाळी उजोणा येथे उघडकीस आली. लाडखेड पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपी अटक केली असून एका विधी संषर्घग्रस्त बालकास ताब्यात घेतले.
रमेश गणेश पाटील (३०) रा. उजोणा असे मृतकाचे नाव आहे. बंडू चंपत पारिसे (३५), गोलु शंकर आमझरे (१८) रा. उजोणा अशी आरोपींची नावे आहे. काल सायंकाळी तो घरून निघून गेला होता. रात्री बराचवेळ होऊनही तो घरी न आल्याने कुटुंबीयांनी त्याची शोधमोहीम सुरु केली होती. मात्र त्याचा थागपत्ता न लागल्याने पत्नीने रमेशच्या मोबाईलवर संपर्क साधला. यावेळी बंडूच्या कुटुंबातील सदस्याने मोबाईन उचलला होता. अशातच आज सकाळी गावालगत नाल्यात रक्ताने माखलेला मृतदेह आढळून आला. ही वार्ता गावात पसरताच नागरिकांनी तेथे मोठी गर्दी केली होती. या घटनेची माहिती मिळताच लाडखेडचे ठाणेदार सतीश पाटील, पोलीस उपनिरीक्षक मनवर यानी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविले. ठाणेदार पाटील यानी तपासचक्रे वेगाने फिरवून दोन आरोपी व एका विधीसंघर्षग्रस्त बालकास ताब्यात घेतले. त्याची कसुन चौकशी केली असता शेतीच्या वादातून कुºहाडीने हल्ला चढवून रमेशचा खून केल्याची कबुली त्यांनी दिली. याप्रकरणी गणेश चंपत पारीसे (६०) रा. उजोणा यांनी दिलेल्या तक्रारीवरून लाडखेड पोलिसांनी आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, २०१ (ब), ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.









