उसतोड न केल्याने शेतकºयांची आत्महत्या

23
यवतमाळ , दि. १७ – डेक्कन शुगर कारखान्याने  उस तोड न केल्याने वादातून मारहाण झाल्याने लिंगी येथील शेतकºयाने आत्महत्या केली. मोतीलाल कुटे (४५) रा. लिंगी (सायखेडा) असे मृतक उस उत्पादक शेतकºयाचे नाव आहे.
डेक्कन शुगरन  गेटकेनच्या परिसरात शंभर उस तोड करणाºया टोळ््या  बसविल्या. त्यापैकी केवळ ५० टोळ््या या गेटमध्ये आहे. गेटकेनच्या बाहेरची उस तोड झपाट्याने सुरू असून परिसरातील उसावर दुर्लक्ष केल्या जात आहे.  आपल्या शिवाय या शेतकºयांना पर्याय नाही अश्या तोºयात डेक्कनचे व्यवस्थापन राहत आहे. त्याचे हे धोरण शेतकºयांच्या जिवाशी खेळ करीत आहे. नोव्हेबर-डिसेंबरचा उस शेतात उभा आहे. पण गेटकेवर मेहरबानी होत आहे. डेक्कन शुगरच्या या कार्यक्रमणालीच्या शेतकºयाला फटका बसतो  आहे. सायखेडा येथील रहिवासी असलेल्या आर्णी तालुक्याचे कृषी सहाय्यकाने फक्त याच शेतकºयांची उस तोड केली नाही. या बाबत जाब विचारण्या करीता  शेतकरी मोतीलाल कुटे गेल असता तेथे वाद झाला. त्यानंतर रात्री कृषी सहाय्यकाने आपल्या सहकाºयांसोबत कुटे याच्या घरी जाऊन मारहाण केली होती. या मारहाणीचा व उस वाळत असून तोड होत नसल्याने हताश होऊन १३ डिसेंबर रोजी विषारी औषध प्राशन केले. हा प्रकार कुटुंबीयाच्या निदर्शनास येताच सदर शेतकºयाला प्रथम आर्णी येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र  चार दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर शेतकºयाचा मृत्यू झाला. आज बुधवारी लिंगी येथे या शेतकºयांवर अत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार गांगुर्डे याच्यासह नागरिक उपस्थित होते. त्याच्या मागे आई, पत्नी, एक मुलगी, एक मुलगा व बराच मोठा आप्त परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 + = four