ऑक्टोबर निकालात औरंगाबादची बाजी

images (1)

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत ऑक्टोबरमध्ये घेण्यात आलेल्या दहावी, बारावी परीक्षेचा निकाल मंगळवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. निकालात औरंगाबाद विभागाने बाजी मारली.

दहावीचा निकाल 29.25 टक्के तर बारावीचा 26.77 टक्के लागला. मार्च परीक्षेप्रमाणोच ऑक्टोबर परीक्षेच्या निकालाची टक्केवारीही वाढली आहे. शिक्षण मंडळाच्या एकूण नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेला राज्यात 1 लाख 35 हजार 916 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 39 हजार 751 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. बारावीला 93 हजार 510 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 25 हजार 28 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंबई विभागीय मंडळातून दहावी परीक्षेला 25 हजार 142 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 6,508 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मुंबई विभागीय मंडळाचा निकाल 25.88 टक्के लागला.

बारावी परीक्षेत 26 हजार

524 विद्याथ्र्यापैकी 7,413 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. ही टक्केवारी 27.95 आहे.

फेब्रुवारी-मार्चमध्ये घेण्यात येणा:या दहावी-बारावी परीक्षेत कोकण मंडळ निकालाच्या टक्केवारीत आघाडीवर असते. परंतु ऑक्टोबर परीक्षेत या मंडळाचा निकाल

सर्वात कमी लागला. कोकण मंडळाचा दहावीचा निकाल

22.48 तर बारावीचा 22.34 टक्के लागला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


5 × = thirty