
यवतमाळ , दि. ८ (विशेष प्रतिनिधी) -यवतमाळ जिल्हा परिषदचे पेपर फुट प्रकरण राज्यात गाजले. या प्रकरणाची चौकशी औरंगाबाद पोलीस करीत असून आज एक पथक शहरात दाखल झाले. त्यांनी आज मंगळवारी प्रभारी सीईओ शरद कुळकर्णी यांची कसुन चौकशी सुरू केली आहे.
जिल्हा परिषदे अंतर्गत कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी, तारतंत्री, तंत्रज्ञ या चार संवर्गासाठी २ नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या लेखी परीक्षेची उत्तरतालिका १ नोव्हेंबरच्या रात्री औरंगाबाद पोलिसांच्या हाती लागली. पथकाने आतापर्यंत अकरा जणांना अटक केली आहे. यवतमाळ जिल्हा परिषद पदभरतीची उत्तरतालिका औरंगाबादमध्ये पोहोचल्याने जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल संशयाच्या भोवºयात सापडले होते. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर सावंत ४ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकाºयांची त्यांच्या निवासस्थानी कसून चौकशी केली होती. उत्तरतालिकेतील जवळपास ७०च्यावर प्रश्नांचे उत्तर मिळते जुळते असल्याने पेपर फुटीवर शिक्कामोर्तब झाले. औरंगाबाद पोलीस पथकाच्या हातात ठोस पुरावे लागल्याने पाळेमुळे खळण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून होत आहे. हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा गाजण्याची चिन्हे आहे. जिल्’ातील आमदारांनी या गंभीर प्रश्नावर मौन धारण केले असले तरी विधानसभा व विधानपरिषदेतील आमदार पेपरफूट प्रकरणावर आक्रमक होण्याची चिन्हे आहेत. औरंगाबाद पथक चौकशीच्या अंतिम टप्प्यात आहे. काही प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याच्या उद्देशाने पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने प्रभारी सीईओंच्या कक्षात अचानक धडक देवून बंदद्वार चौकशी केली. पथकाने सीईओंना नऊ प्रश्नांची लिखित स्वरूपात उत्तरे मागितली आहे. दोन तास केलेल्या चौकशीबाबत कमालिची गुप्तता पाळण्यात आली होती. यात पथक प्रमुख पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्यासह चार कर्मचाºयांचा समावेश होता.









