
मुंबई दि. ६ – पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीकच्या बेलवडे गावाजवळ शनिवारी पहाटे भीषण अपघात झाला. इंचलकरजीहून शिर्डीला निघालेल्या भाविकांच्या खासगी बसला कंटेनरने जोरदार धडक दिली.
या अपघातात बसमधील पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. आठ प्रवासी जखमी झाले आहेत. काही जखमींना कराडच्या सरकारी रुग्णालयात तर, काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बेलवडे गावाजवळ बस रस्त्याच्या कडेला थांबली असताना, मागून वेगात आलेल्या कंटेनरने बसला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीवेळासाठी विस्कळीत झाली होती. अपघातानंतर कंटेनरचा चालक कंटेनर तिथेच सोडून फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.









