कवीतेचा झरा काळजात जिवंत असावा – शंकर बडे

IMG-20141215-WA0026
एक अधिक एक अकरा काव्य संग्राहाचे प्रकाशन
यवतमाळ, दि. १५ (प्रतिनिधी) – कविता ही शिकून येत नसत कवितेचा झरा हा काळजात जिवंत असावा लागतो. हे जसे खरे आहे. तसेच प्रत्येकात एक कवी असतो. मात्र त्याला जिवंत ठेवणारी संवेदनशिलता बोबट होऊ न देण्याची गरज असते. एक अधिक एक अकरा या काव्या संग्रहातील कवितेत हा जो जिवंतपणा आहेत. तो मला भावला असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी शंकर बडे यांनी केली. मनिष काळे लिखीत काव्य संग्रहाच्या प्रकाशन सोहळ््यात ते बोलत होते.
राळेगाव पंचायत समिती सभागृतात हा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी विधानसभा उपाध्यक्ष प्रा. वसंत पुरके, श्रमिक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पखाले, गुरूदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष विलास भोयर, पंचायत समिती सभापती बेबीताई जवादे, तहसिलदार सुरेश कव्हळे, उपसभापती सुरेश मेश्राम, प्रा. सदानंद चौधरी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. वसंत पुरके म्हणाले की, काव्य संग्रहातील शेतकरी, खंत, जमान, बळी इत्यादी कवितावर मार्मिक भाष्य केले. सोबतच एक अधिक एक अकरा या शिर्षकाचे विश्लेशन केले. तर नितीन पखाले यांनी पत्रकारीता व साहित्यावर भाष्य केले. तहसिलदार सुरेश कव्हळे यांनी शेतकरी आत्महत्योबाबत चिंता मनोगतातून व्यक्त केली. यावेळी राजू रोहणकर, राजेश काळे यांनीही विचार मांडले. या सोहळ््याला डॉ. के. एस. वर्मा, महेश शेंडे, प्रा. पिंपरे, फिरोज लाखाणी, संजय दुरबुडे यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


one × 5 =