
ठाणे – मुंबई – आग्रा महामार्गावरील कसारा घाटात टँकर उलटून झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाले आहेत. रविवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला.
संगमनेरहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या दुधाच्या टँकरला कसारा घाटातील वळणावर अपघात झाला. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले.मृत्यू झालेले पाचही जण गोरेगाव येथील रहिवासी आहेत. जखमींना नाशिक येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टँकरच्या चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुभाजकावर आदळून टँकर उलटल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.









