काँग्रेसचा रास्तारोको, एक तास वाहतूक ठप्प

IMG-20150209-WA0057

यवतमाळ, दि. ९ – शेतकरी दुष्काळाच्या दुष्ट चक्रात होरपळत आहे. त्यांना दिलासा देण्याऐवजी सरकार शेतकरी विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप करीत आज सोमवारी जिल्हा काँग्रेस कमेटीच्यावतीने पांढरकवडा बायपासवर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सरकारविरोधी नारेबाजी करीत काँग्रेसने तब्बल एक तास वाहतूक रोखून धरत संताप व्यक्त केला.
यंदा पावसाने अवकृपा दाखविल्याने खरीप हंगाम हातातून गेला आहे. दुबार, तिबार पेरणीमूळे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे. पीकाचा उतारा कमी आल्याने कर्ज कसे फेडायचे याची चिंता शेतकºयांना सतावत असून, या विवंचनेत शेतकरी आत्महत्या करीत आहे. अशा स्थितीत शेतकºयांना धीर देण्याची गरज असताना, सत्ताधारी सरकार शेतकºयांना नागविण्याचे काम करीत आहे. शेतकºयांना मदत जाहिर करण्यात आली आहे, मात्र ती तोकडी व शेतकºयांची थट्टा करणारी आहे. दोन हेक्टरची मर्यादा घालून ४० टक्के शेतकºयांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. भू-संपादनाच्या प्रक्रियेत बदल करण्यात आला असून, शेतकºयांच्या जमिनीची दर शासन ठरविणार असल्याने शेतकºयांचे नुकसान होणार आहे. शासन शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी विरोधी निर्णय घेत असल्याचा आरोप करीत आज जिल्हा काँग्रेस कमेटीने पांढरकवडा मार्गावर रास्तारोको केला. यावेळी चारही मार्गाची वाहतूक विस्कळीत झाली होती. सरकारविरोधी नारेबाजी करीत शेतकºयांच्या हिताचे निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली. यावेळी पोलिसांनी जिल्हाध्यक्ष वामन कासावार, माजी सामाजिक न्यायमंत्री अ‍ॅड. शिवाजीराव मोघे, माजी राज्यमंत्री संजय देशमूख, राहुल ठाकरे, अशोक बोबडे, देवानंद पवार, विजया धोटे, तातू देशमूख, अशोक धवड, दिनेश गोगरकर, अनिल गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना स्थानबद्घ केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


3 + one =