काँग्रेसचे आंदोलन, लाठीचार्ज

congress-logo-360x571
नागपूर – शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत नागपूर विधान भवनासमोर आंदोलन केले. यावेळी आक्रमक आंदोलकांनी थेट बॅरिकेड्स तोडत विधान भवनाकडे धाव घेतली. त्यामुळे पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला.
महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम यांच्या नेतृत्त्वाखालील हा मोर्चा काढण्यात आला. युवक काँग्रेसचे पदाधिकारी विधानसभा आवारातील बॅरिकेडस तोडून विधानसभेकडे पुढे सरकले. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्रमक झालेले कार्यकर्ते पोलिसांच्या विनंतीला न जुमानता विधान भवनाच्या दिशेने धावत सुटले. अखेर कायदा-सुवस्थेसाठी पोलिसांना लाठीमार करणे भाग पडले.मात्र, लोकशाही मार्गाने काढलेल्या मोर्चावर पोलिसांना लाठीमार करायला भाग पाडून भाजप सरकारने आपल्या ताकदीने आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप विश्वजित कदम यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


four × = 12