काँग्रेसला विकास करण्यासाठी ६०० वर्षे लागतील – मोदी

index
बिजनौर –  ‘देशाच्या विकासाचा नुसता ‘मॅप’ बनवण्यासाठी काँग्रेसच्या शहजाद्यांना ६० वर्षे लागली; आता विकास प्रत्यक्षात आणायसाठी आणखी ६०० वर्षे लागतील,’ अशी घणाघाती टीका एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी केली.
उत्तर प्रदेशातील बिजनौर येथे आज (रविवार) झालेल्या प्रचारसभेत मोदी बोलत होते. ‘काँग्रेस आतापर्यंत फक्त वोट बँकेचे राजकारण करत आली आहे. त्यामुळे देश खिळखिळा बनला आहे. काँग्रेसमधील सर्व नेते एकाच परिवाराचे गुणगान गाण्यात गुंतले आहेत. या परिवाराच्या नादात काँग्रेसचे देशाकडे लक्ष राहिले नाही. एवढेच काय पंतप्रधानांकडेही लक्ष राहिले नाही. काँग्रेसचा कुठलाही नेता पंतप्रधानांना आपला नेता म्हणण्यास तयार नाही, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
‘मोठमोठ्या गप्पा मारण्यासाठी मी इथे आलेलो नाही. मी स्वतः चहा विकला आहे. त्यामुळे गरिबी काय असते याची मला जाणीव आहे, असे सांगतानाच, ‘गेल्या अनेक वर्षांपासून देशाला लुटणाऱ्या सत्ताधाऱ्यांना देशातील युवक माफ करणार नाहीत,’ असेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ two = 5