कुटुंबप्रमुखानं केली आई, पत्नी आणि मुलीची हत्या

02_10_2012-crime9
पुणे – पुण्याच्या वानवडी भागात एका कुटुंबप्रमुखानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आपली आई, पत्नी आणि मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली आहे. सागर गायकवाड असं या व्यक्तीचं नाव असून त्यानंही आत्महत्येचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यातून बचावल्यानंतर तो पोलिसांना शरण आला आहे.
सागर गायकवाड (४० वर्षे) हा गेल्या दोन वर्षांपासून बेरोजगार होता. त्याच्या डोक्यावर सात लाख रुपयांचं कर्ज होतं. बीपीओ कंपनीत नोकरी असताना त्याचे हप्ते तो भरू शकत होता. परंतु, दोन महिन्यांपासून तो हप्ते देऊ न शकल्यानं कर्जदारांनी त्याच्यामागे तगादा लावला होता. हळूहळू सगळंच हाताबाहेर जाईल, या भीतीनं तो खचून गेला आणि नैराश्याच्या भरातच त्यानं आपलं कुटुंब संपवलं. आई शकुंतला (५८), पत्नी कविता (३६) आणि मुलगी ईशिता (७) या तिघींचा त्यानं काल दुपारी घरातच ओढणीनं गळा दाबून खून केला. त्यानंतर, गळफास घेऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला. परंतु, त्यातून तो बचावला. शेवटी, आज सकाळी नऊच्या सुमारास सागरनं वानवडी पोलीस स्टेशनात जाऊन घटनेची माहिती दिली. कर्जबाजारीपणाला कंटाळून आपणच हा प्रकार केल्याचं त्यानं कबूल केलं. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढचा तपास सुरू केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


+ 4 = ten