
उमरखेड, दि. १६ – तालुक्यातील नागेशवाडी येथे आज केंद्रीय पथकाचा दौरा होता. मात्र नागेशवाडीला भेट न देता हुलकावणी दिल्याने शेतकºयांनी सायंकाळी ७ वाजता यवतमाळ-उमरखेड महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले.
केंद्राचे पथक नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी येणार म्हणून दुपारपासून आपल्या व्यथा मांडण्यासाठी शेतकरी सुरोशे यांच्या शेतात थांबून होते. आता येणार मग येणार म्हणून शेतकरी सायंकाळ पर्यंत थांबुन होते. तरीही पथक न आल्याने ३०० शेतकºयांनी यवतमाळ-उमरखेड मार्गावर रास्तारोको केला. अखेर सायंकाळी ७.३० वाजता नागेशवाडी येथील शोभा दादाराव सुरोशे या महिलेच्या शेतीला रात्री दरम्यान भेट देवून पाहणी केली. या पथकात वेणू नारायणनन, वंदना सिंगल यांच्यासह दोन अधिकाºयांचा समावेश होता. सारवासारव करता रात्री अंधारात शेतकºयांसोबत संवाद साधला. यावेळी काही शेतकºयांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या. पथकाची पाहणी केवळ कागदीघोडे नाचविण्याचा प्रकार असल्याची संतप्त प्रतिक्रीया शेतकºयांनी व्यक्त केली.









