केंद्रीय समितीकडून जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

DSC_6959

नुकसानीचा घेतला आढावा
यवतमाळ (दि.१३ मार्च)- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात सतत पाऊस व गारपीट होत आहे. या गारपीटीत जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. आज जिल्ह्यात आलेल्या केंद्र शासनाच्या एक सदस्यीय समितीने नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली तसेच ठिकठिकाणी नुकसानग्रस्त शेतकºयांशी चर्चा करुन नुकसानीचा आढावा घेतला.
गेले काही दिवस सतत झालेला पाऊस व गारपीटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या समित्या विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरुन पाहणी करीत आहे. यामध्ये केंद्रीय जल आयोगाचे संचालक असलेले डॉ.डी.एम.रायपुरे यांच्या एक सदस्यीय समितीने आज जिल्ह्यात विविध भागांना भेटी देवून पाहणी केली. डॉ. रायपुरे यांनी विश्रामभवन येथे अप्पर जिल्हाधिकारी इंद्रसेन तिटकारे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गायकवाड यांच्यासह उपविभागीय अधिकाºयांसोबत बैठक घेवून नुकसानीची माहिती घेतली. त्यानंतर आर्णी, दिग्रस, दारव्हा व नेर यातालुक्यातील काही गावांना भेटी देवून प्रत्यक्ष पाहणी केली. आर्णी तालुक्यातील काठोडा येथे दिगांबर एकघरे यांच्या शेतातील खराब झालेल्या हरभरा पिकाची पाहणी केली. दिग्रस तालुक्याती तुपटाकळी येथे विष्णू ठाकरे, दीपक आनंदवार या शेतºयांचे गहू, हरभरा, संत्रा, मोसंबी पिकांची पाहणी करण्यासोबतच शेतकºयांसोबत चर्चा दारव्हा तालुक्यात पळशी येथे भेट दिल्यानंतर गारपीटीत जनावरे दगावलेल्या शेतकºयांशी त्यांनी संवाद साधला. लाख खिंड येथे अन्नाजी चौधरी यांच्या संत्रा पिकाच्या नुकसानीची पहाणी डॉ.रायपुरे यांनी केली. त्यानंतर नेर विश्रामभवन येथे तालुक्यातील नुकसानीची माहिती त्यांनी जाणून घेतली. यावेळी संबंधित उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार आदी अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केल्यानंतर समिती अमरावती जिल्ह्याकडे रवाना झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


1 + six =