केजरीवालांनी याआधीची चूक पुन्हा करु नये – अण्णा हजारे

Anna Hazare addresses media
राळेगणसिद्धी- दिल्ली विधानसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवणा-या आम आदमी पक्ष आणि नेते अरविंद केजरीवाल यांचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी अभिनंदन केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही त्यांनी यावेळी टीका केली.
दिल्लीत भाजपाला मिळालेले हे अपयश हा तर पंतप्रधान मोदींचा पराभव आहे. मोदींनी दिल्लीतील नागरिकांची विश्वासार्हत गमावली. ते भ्रष्टाचार रोखण्यात अपयशी ठरले, असे हजारे यांनी यावेळी सांगितले.
दिल्ली निवडणुकीत आप ६०हून अधिक जागांवर आघाडीवर असल्याने आपला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र आहे. दिल्लीत मिळालेल्या अभूतपूर्व यशाबद्दल केजरीवालांचे अभिनंदन. मात्र मुख्यमंत्री असो वा नसो, त्यांनी केलेले आंदोलन विसरता कामा नये. भ्रष्टाचारविरोधी चळवळीमुळेच केजरीवालांना नागरिकांचा विश्वास संपादन कऱण्यात यश मिळाले आहे. त्यामुळे यापूर्वी केलेली चूक केजरीवाल यांनी पुन्हा करु नये, असे अण्णा म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


2 + = four