
कल्याण – कल्याण-डोंबिवली अंतर्गत होणाञा निकृष्ट दर्जाचे रस्ते, बी.एस.यू.पी घरकुल यात होणारा भ्रष्टाचार यावर एनसीपी चे माजी मंत्री जितेंद्र अाव्हाड यांनी त्यांची सत्ता गेल्यानंतर अारोपांची झोड लावली अाहे.
बुधवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी होणार्या भ्रष्टाचाराची माहिती दिली कि, बी.एस.यू.पी घरकुल यात करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झालेले असून या विषयावर मागील महिन्यात नगरसेवकांना विश्वासात घेऊन एक बैठक घेण्यात अाली होती,व त्यावेळेस असलेले अायुक्त सोनवणे यांचा भ्रष्टाचाराच्या बाबतीत अधिकाञांवर असलेला अाशिर्वाद हे विषय बैठकीत मांडण्यात अाल्यावर सोनवणे यांची तात्काळ बदली झाली,पण बदली होऊन चालणार नाही,तर झालेला भ्रष्टाचाराचा सत्य जनतेसमोर यावा यासाठी अात्ता असलेले अायुक्त अर्दड यांची भेट घेउन,झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी असे त्यांना सांगितले अाहे,व अर्दड यांनी देखील चौकशीचे अाश्वासन दिले अाहे.कल्याण-डोंबिवली शहराची ओळख ही नौकरदाराचे व कष्टकञांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथे २% उद्योगधंदा व ९८% लोक हे नौकरी-धंदा करणारा,मध्यमवर्गीयांचा व टॅक्स भरणारा शहर अाहे,तसेच कल्याण-डोंबिवली बिल्डींगमध्ये राहणाञा मध्यम वर्गीय माणसाने टॅक्स भरले नाही अशी तक्रार अाली नाही,तरी त्यांच्या नशिबी हे निकृष्ट दर्जाचे रस्ते व बी.एस.यू.पी घरकुल हे भ्रष्टाचाराचा मोठा उच्चांक अाहे.या भ्रष्टाचारा विषयी हायकोर्टात याचिका दाखल केली असून,मा.अायुक्त अर्दड यांनी पुढाकार घेऊन चौकशी केली तर सत्य समोर येईल.









