
अतिवृष्टीग्रस्तांना तात्काळ मदत देण्याची मागणी
यवतमाळ – जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले. शिवसेनेच्या खा. भावना गवळी, आ. संजय राठोड व शेतकºयांनी गारा, मृत प्राण्यांसह जिल्हा कचेरीवर मोर्चा काढून तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली.
जिल्ह्यात दहा-पंधरा दिवसापासून अवकाळी पाऊस व गारपिट सुरु आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा यासह संत्रा, मोसंबी, लिंबु, पपई आदि फळबागाचे हाती आलेले पिक जमिनदोस्त झाल्याने लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे.आज शिवसेनेच्या खा. भावना गवळी, आ. संजय राठोड आणि शेतकºयांनी जिल्हा कचेरीवर धडक दिली. अतीवृष्टीग्रस्त, गारपिटग्रस्त भागाची पाहणी करून शेतकºयांना सरसकट आर्थिक मदत करावी , ज्या भागातील पिकांची पैसेवारी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे त्या ठिकाणी दुष्काळी परिस्थितीच्या सर्व सोयी सवलती लागु कराव्या अशी मागणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख बाळासाहेब मुनगिनवार, माजी आमदार विश्वास नांदेकर, युवासेना जिल्हाध्यक्ष गजानन बेजंकीवार, प्रविण पांडे, अरविंद गादेवार, हरिहर लिंगणवार, राजेंद्र गायकवाड, शैलेश ठाकुर, गजानन डोमाळे, प्रविण शिंदे, किशोर इंगळे, राजेंद्र गिरी, संजय रंगे, पराग पिंगळे, सचिन राठोड, अरुण वाकडे, गजानन पाटील, अनिल लांडगे, अतुल गुल्हाणे, राजू नागरगोजे, गजानन भोकरे, सदानंद कोंडेवार, रविंद्र भारती, सुभाष वारवड, विनोद काकेड, संतोष ठावरे, मनोज भोयर, गजनन कोळणकर, किशोर वाघ, हरिहर हरबडे, पृथ्वीराज आडे, विनायक भवरे आंदोलनात सहभागी झाले होते.









