
यवतमाळ , दि. २९- करणी केल्याच्या कारणावरून इसमाचा खून करणाºया जवाहर नगर धुंदी येथील दोन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. पुसद येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अनिल सुब्रम्हण्यम् यांनी आज गुरूवारी हा निकाल दिला. कैलास श्रीराम चव्हाण, मधुकर कीसन राठोड अशी शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहे.
प्रकाश तुकाराम राठोड रा. जवाहर नगर धुंदी हा नागपूर येथील इंडियन आॅईल कंपनीत ड्रायव्हर या पदावर कार्यरत होता. सदर व्यक्तीवर कैलास चव्हाण याच्या आईला करणी केल्याचा आरोप केला होता. त्यामुळे राठोड व चव्हाण यांच्यात पंधरा वर्षापासून वाद सुरू होता. तसेच आरोपी मधुकर कीसन राठोड, लक्ष्मी किसन राठोड, शोभा मधुकर राठोड, सिमा रमेश राठोड, रमेश किसन राठोड, अतुल मधुकर राठोड यानी प्रकाशला जीवे मारण्याची धमकी दिली होती. ७ आॅगस्ट २०१० रोजी धुंदी गावात आत्माराम जाधव याच्या तीसºया दिवसाच्या कार्यक्रमासाठी सदर ट्रायव्हर आला होता. कार्यक्रम आटोपून तो भारत आडे, पुरासिंग आडे यांना घेऊन दुचाकीने पुसदकडे जात होता. अशातच आरोपी कैलास व मधुकर याने धुंदी गावाजवळ मोटर सायकल खाली पाडली. त्यानंतर दोन्ही आरोपींनी कुºहाडीने वार करून प्रकाशचा खुन केला. या प्रकरणी भारत नरसिंग आडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पुसद ग्रामीण पोलिसांनी सात आरोपीविरूद्घ भादंवि कलम ३०२, ३४१, १४७, १४८, १४९, ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक आर.वाय. भद्रे यांनी आरोपींना अटक करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. तसेच पोलीस उपनिरीक्षक पि.आर. सुळे यांनी फरार असलेल्या मधुकर, रमेश व अतुल या तीन आरोपींना अटक केली होती. पुसद येथील अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधिश अनिल सुब्रमण्यम् यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी पार पडली. यामध्ये सरकारी पक्षाच्या वतीने १५ साक्ष तपासण्यात आले. त्यामध्ये आरोप सिद्घ झाल्याने आरोपी कैलास व मधुकर यास जन्मठेप सुनावली. तसेच प्रत्येकी दहा हजार रुपये दंडही ठोठावला. तर उर्वरीत पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. सुधाकर राठोड यांनी काम पाहीले.









