यवतमाळ – जिल्ह्यातील गारपीट व वादळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदतद्यावी यासह विविध मागण्यासाठी आ. संजय राठोड १० मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहे.
गारपिट व वादळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकºयांचे गहू, हरबरा, बागायती, पिकांचे अतोनात नुकसान झाले असून या संदर्भात विधानसभा सभागृहात प्रश्न उपस्थित झाला आहे. नुकसानग्रस्त शेतकºयांना मदतीचे आश्वासन मुख्यमंत्री ना. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्यानंतरही अंमलबजावणीला सुरुवात झाली नाही. सर्वेक्षण अहवाल या बाबतील वेळ न घालवता शेतकºयांना तातडीने मदत करावी, बँकाची सक्तीची वसुली थांबवावी, पिकांची पैसेवारी कमी असल्यामुळे दुष्काळी परिस्थितीत मिळणाºया सवलती मिळावा, २०१३ मध्े अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना आर्थिक मदत मिळावी या मागण्यांसाठी धरणे आंदोलन करणार आहे. या धरणे आंदोलनात शिवसेना उपजिल्हाप्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगर सेवक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व सर्व पदाधिकाºयांनी सहभागी व्हावे असे आवाहन आ. संजय राठोड यांनी केले आहे.









