गुगलचे ई-मेल्स होणार अधिक सुरक्षित

gmail-logo
पत्रलेखन मागे पडून आता जमाना झाला. आता प्रत्येक पत्र ‘ई-मेल’द्वारे लिहिले जाते. या ‘ई-मेल’ने जगात क्रांती घडवली आहे. जगभरातील इंटरनेटवर लक्ष ठेवणा-या अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा कार्यक्रमाने खळबळ उडाली. कारण आपले ‘ई-मेल’ अकाउंट सुरक्षित नसल्याने सर्वच नेट वापरणा-यांमध्ये घबराट पसरली. आपण लिहिलेले पत्र कोणीही वाचत असल्याचे लक्षात आल्याने प्रत्येक या सेवेविषयी साशंक राहू लागला. आता जगातील सर्वाधिक लोकप्रिय सर्च इंजिन गुगलने आपल्या ‘ई-मेल’ना अधिक सुरक्षेचे कवच पुरवले आहे. त्यामुळे ही सेवा वापरणाऱ्यांना खात्रीशीर सुरक्षेचा अनुभव मिळणार आहे.
तुमचे ‘ई-मेल’ अकाउंट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ते अधिक सुरक्षित असावे अशी तुमची इच्छा असते. ही बाब आमच्यासाठी अधिक महत्त्वाची आहे, असे ‘जी-मेल’चे सुरक्षा अभियंता निकोलस लिडबोरस्की यांनी सांगितले. गुगलने ‘जी-मेल’ची सेवा सुरू केली तेव्हापासून ती कायम ऌळळढर’चा वापर करते. आजपासून या ई-मेल अकाउंटला अधिक सुरक्षा कवच पुरवले आहे. त्यामुळे तुमचा संदेश कोणीही वाचू शकणार नाही. तुम्ही सार्वजनिक ठिकाणी ‘वाय-फाय’ सेवा वापरून संगणक, फोन आणि टॅब्लेट वापरल्यावरही सुरक्षेबाबत काहीच अडचण येणार नाही.
तुम्ही पाठवलेला प्रत्येक ‘ई-मेल’ हा १०० टक्के सुरक्षित आहे. याची माहिती केवळ तुम्ही आणि जी-मेलच्या सव्र्हरलाच असते. तसेच ही माहिती गुगलच्या डेटा सेंटरला असते. २०१३ मध्ये जी-मेल वापराचे प्रमाण ९९.९७८ टक्के होते. वर्षभरात केवळ दोन तास ही सेवा बंद राहिली होती. आमचे अभियांत्रिकी तज्ज्ञ आठवडयाचे सात दिवस व २४ तास यंत्रणेवर लक्ष ठेवून असतात. कोणतीही अडचण उद्भवल्यास ते तत्काळ त्यातून मार्ग काढतात. तसेच यंत्रणेत एखादा दोष निर्माण झाल्यास भविष्यात तो उद्भवू नये, म्हणून आमचे तज्ज्ञ त्याचे पूर्णपणे विश्लेषण करतात, असे लिडबोरस्की यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


8 − = three