
कल्याण : बंजारा समाजाला अनुसुचित जमातीत समावेश करण्यासाठी तसेच क्रिमिलीअरची अट रद्द करून मिळणे व बंजारा समाजाच्या अनेक प्रलंबित मागण्यासाठी बंजारा समाजाच्या सर्व संघटनांनी एकत्र येवुन “गोर बंजारा संविधानिक हक्क महासमिती” गठीत केली असुन या समितीचे नेतॄत्व बंजारा समाजाचे धर्मगुरू तपस्वी संत रामरावजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व संघटनांचे अध्यक्ष करत असुन मोर्चाचे नेतॄत्व तपस्वी संत रामरावजी महाराज करणार आहेत.त्यामुळे संपुर्ण महाराष्ट्रातुन किमान तीन ते चार लाख बंजारा बांधव या मोर्चात सहभागी होत आहेत.तरी सर्व समाज बांधवांना आवाहन करण्यात येत आहे की बंजारा समाजाला संविधानिक हक्क मिळवुन देण्यासाठी मोठया संखेने या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रीय बंजारा टायगर्स चे कल्याण तालुका अध्यक्ष सतिष राठोड यांनी केले आहे.









