
नवी दिल्ली- गोहत्या बंदी कायद्यावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी सोमवारी स्वाक्षरी केली. यामुळे महाराष्ट्रात गोवंश हत्याबंदीचा कायदेशीर मार्ग मोकळा झाला आहे. एकोणीस वर्षांपासून ही मागणी प्रलंबित होती.
गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिक मानले जाते. त्यामुळे गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्याची मागणी करण्यात आली होती. गोहत्या बंदी कायद्यासाठी ३० जानेवारी १९९६ रोजी प्रस्ताव राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला होता.
राष्ट्रपतींनी या प्रस्तावावर आता स्वाक्षरी केल्याने गोवंश हत्येला बंदी घालण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आता हा कायदा लवकरच महाराष्ट्रात लागू होईल, अशी प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली.









