
नेर – तथागत भगवान गौतम बुद्घाने ज्या प्रमाणे राजाची गादी सोडून मानव घडविण्यासाठी जिवन खर्ची घातले असून त्यांचे विचार तळागळात पोहचविण्याची गरज आहे. असे प्रतिपादन आ. संजय राठोड यांनी केले.
स्थानिक भिमनगरात बौद्घ पोर्णिमे निमित्य आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते. सर्वप्रथम भगवान गौतम बुद्घाच्या प्रतिमेला हारार्पण करून अभिवादन केले. पुढे बोलताना आ. राठोड म्हणाले की, गौतम बुद्घाने सांगितल्या प्रमाणे धर्म आणि सत्य यात संघर्ष असेल तर सत्याचे अनुसरण करा असे आवाहन केले. यावेळी नगराध्यक्ष पवन जयस्वाल, संजय दारव्हटकर, नामदेव खोब्रागडे, विनोद जयसिंगपूरे, दिपक मिसळे, अशोक फुलझेले, प्रा. सागर गावंडे, प्रा. नाजुक धांदे, गंगाधन मिसळे, सिद्घरर्थ मिसळे, सुलोचना भोयर, नितीन कराळे उपस्थित होते.









