
आर्णी , दि ३१ – तालुक्यातील घोनसरा येथील युवकाचा ईवळेश्वर शिवारात अनैतिक संबधातून खून करण्यात आल्याची घटना सकाळी आठ वाजता दरम्यान उघडकीस आली. उबेद खान (२२) रा. घोनसरा असे मृताचे नाव आहे. उबेदचे ईवळेश्वर येथील विवाहीत महिलेसोबत एक वर्षापासुन अनैतिक संबंध होते. तिला भेटण्यासाठी उबेद रात्री दरम्यान जात होता. काल रात्री ८ वाजता दरम्यान घोनसरा येथून जेवन न करता तो घरून गेला होता. रात्रभर घरी न आल्याने घरातील सर्वजन त्याची काळजी करत होते. ईवळेश्वर येथील नारायण कुडमथे यांनी मृतकाचा मोठा भाऊ फयाज खान यास सकाळ दरम्यान फोन करून ईवळेश्वर शिवारातील भाऊराव मडपाजी यांच्या शेताजवळ असलेल्या नालीत उबेदचा मृतदेह पडून असल्याची माहीती दिली. लगेच मृतकाच्या नातेवाईकांनी घटनास्थळ गाठले. त्यावेळी उबेदच्या डाव्या पायाला मार आणि गळा दाबलेल्या अवस्थेत आढळुन आला. याप्रकरणी उबेदचे वडील अमानुल्ला खान अमिर खान (५५ ) यांनी आर्णी पोलीसात तक्रार दिली. त्यावरून उज्वला मडावी, शारदा आडे, चंदू कुडमथे, शंशीकांत कुडमथे, लवकुश कुडमथे, गजानन ठवकर सर्व रा. ईवळेश्वर यांच्या विरुद्ध कलम ३०२, २०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला असून घटनेचा तपास ठाणेदार हनुमंतराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनेश जाधव करित आहे.









