चाकुच्या धाकावर दाम्पत्याला लुटले

यवतमाळ :  येथून वर्धेकडे जाणाºया दाम्पत्याची दुचाकी अडवून चाकुच्या धाकावर एक लाख २५ हजाराचे दागिन्यासह रोख रक्कम लुटल्याची घटना आज जवाहर नगरजवळ घडली. अमोल मोहन पांडे (३२) रा. सेवाग्राम वर्धा हे पत्नी व मुलीला घेऊन बलवंत मंगल कार्यालयात लग्नसमारंभासाठी आले होते. लग्न समारंभ आटोपून ते दुचाकीने वर्धेकडे जात होते. अशातच जवाहर नगरजवळ तोंडाला कापड बांधून आलेल्या तीन जणांनी पांडे यांना हात दाखवून दुचाकी थांबविली. त्यानंतर चाकुचा धाक दाखवून पांडेच्या पत्नीच्या गळ््यातील सोन्याचे दागिने अंगठी असे ४५ ग्रॅम सोने व १ हजार २०० रुपये रोख असा एकुण एक लाख २५ हजाराचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला. पांडे यांनी शहर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार नोंदविली. याप्रकरणी पोलिसांनी तीन्ही चोरट्याविरूद्घ भादंवि कलम ३९२, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


seven + 7 =