चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा खून

crime_logo
यवतमाळ, दि. २४ – चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीला जाळून मारल्याची घटना आडद येथे घडली. या प्रकरणी पोफाळी पोलिसांनी पतीला अटक केली.
पदमा पांडुरंग कबले (२१) रा. आडद ता. उमरखेड असे मृतक महिलेचे नाव असून वर्षभरापूर्वी आडद येथील पांडुरंग साहेबराव कबले (२४) याच्यासोबत विवाह झाला होता. या दाम्पत्याला अडीच महिन्याचा मुलगा देखील आहे. सुरळीत संसार सुरू असताना पांडुरंग पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घेत होता. त्यामुळे तिला माहेरीही आणण्यात आले होते. दरम्यान बाळंतपणानिमित्त पद्मा रुपाळा येथेच होती. आठ दिवसापूर्वी पांडुरंगने तिला आडदला आणण्यास सांगितले. त्यानुसार वडिलांनी आडद येथे आणून दिले. पद्माने त्यानंतर पती त्रास देत असल्याचे मोबाईलवरून सांगितले, असे तक्रारीत नमूद आहे. दरम्यान २२ डिसेंबर रोजी दुपारी झोपडीच्या आगीत पदमाचा जळून मृत्यू झाला. या प्रकरणी तिचे वडील प्रल्हाद दिगंबर बुरकुले (४०) रा. रुपाळा ता. उमरखेड यांनी पोफाळी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी आरोपी पती पांडुरंग कबले याला अटक करून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


× nine = 81