यवतमाळ – येथील जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयाला सन २०१४ चा ‘उत्कृष्ट शैक्षणिक गुणवत्ता ‘पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेच्या सचिव शीतल वातिले, संचालक पवन वातीले आणि प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर यांना पद्मविभूषण डॉ.करणसिंग यांच्याहस्ते हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कारामुळे संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अर्थ-रिसर्च आर्गनायझेशन व प्लॅनिंग कमिशन (भारत सरकार) यांच्या संयुक्त पुढाकारातून दिल्ली येथील पंचतारांकित हॉटेल शांगरीला इरॉस येथे हा पुरस्कार समारंभ पार पडला. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे वरिष्ठ सदस्य, सदर-ऐ-रियासत व जम्मू-काश्मिरचे माजी राज्यपाल, राज्यसभा सदस्य, पद्मविभूषण डॉ. करणसिंग या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. त्यांच्याच हस्ते ‘बेस्ट इंजिनीअरिंग कॉलेज इन महाराष्ट्र’ या पुरस्काराने जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयास सन्मानित करण्यात आले. अभियांत्रिकीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय म्हणून जगदंबा अभियांत्रिकी महाविद्यालयास संपूर्ण महाराष्ट्रात नावलौकीक प्राप्त झाला आहे. या यशात विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व व्यवस्थापकीय मंडळ सहभागी असल्याचे मत शीतल वातीले यांनी व्यक्त केले. ते पत्रकार परिषदेत बोलत होत्या. यावेळी प्राचार्य डॉ. सुरेंद्र कळसपूरकर, विविध विभागाचे प्रमुख, प्राध्यापकांनी विशेष प्रयत्न केले. पुरस्कार वितरण सोहळ्यास संस्थेच्या सचिव शीतल वातिले, संचालक पवन वातीले, प्राचार्य सुरेंद्र कळसपूरकर, विभागप्रमुख प्रा. हेमंत बारडकर, प्रा.महेश नालमवार व प्रा.राम सोळंकी, प्रा.राजेश हेडावू, डॉ. मिलींद सरोदे, प्रा. विजय नेवे आदि उपस्थित होते.









