जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी टोल फ्री क्रमांक

Untitled
यवतमाळ , दि. ३० – जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारी सोडविण्यासाठी जिल्हा परिषदेत टोल फ्रि क्रमांकाची सुविधा करण्यात आली. तक्रार निवारण केंद्राचे उद्घाटन जि.प.अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले आहे.
स्वच्छ भारत मिशन, रमाई व राजीव गांधी आवास योजना अंतर्गत वैयक्तिक शौचायलाबाबत तक्रारींचे निवारण करण्यासाठी १८००२३३६३२ हा क्रमांक सुरू करण्यात आला आहे. वैयक्तिक तक्रार असल्यास या क्रमांक्रावर संपर्क साधता येणार असून ही सुविधा सकाळी १० वाजतापासून ते सायंकाळी ७ पर्यंत सुरू राहणार आहे. ज्या विभागासंबंधी तक्रार आहे, त्यांच्याशी संपर्क साधून समस्यांचे निवारण करण्यात येईल. या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जि.प.अध्यक्ष डॉ. आरती फुफाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी केले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण मोहोड यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− two = 1