जागतिक युद्धांमागे मुस्लिम व ख्रिश्चन

46290-vhp-ashok-500
नवी दिल्ली , दि. २१ – धर्मांतराच्या मुद्द्यावरून देशात सुरू असलेल्या वाद-प्रतिवादाला विश्व हिंदू परिषदेचे नेते अशोक सिंघल यांनी नवे वादग्रस्त वळण दिले आहे. सिंघल यांनी मुसलमान आणि ख्रिश्चनांवर थेट टीका केली असून हे दोन धर्मच जगातील युद्धांना कारणीभूत आहेत,’ असा आरोप केला आहे. सिंघल यांच्या या वक्तव्यामुळे देशातील धार्मिक वातावरण तापण्याची शक्यता आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सिंघल यांनी हिंदुत्ववादी संघटनांकडून सुरू असलेल्या धर्मांतराच्या ‘घर वापसी’ मोहिमेची पाठराखण केली आहे. ‘आम्ही धर्म परिवर्तन करण्यासाठी नाही तर मनं जिंकण्यासाठी निघालो आहोत,’ असं ते म्हणाले. ‘जगातील सध्याच्या परिस्थितीवरून जागतिक महायुद्ध अटळ असल्याचे दिसत आहे. या युद्धातील खरे ‘खिलाडी’ मुसलमान आणि ख्रिश्चन आहेत. हिंदू त्याच्यापेक्षा वेगळा आहे, असे सांगून, ‘सध्या जग इस्लामी दहशतवादाच्या सावटाखाली आहे,’ असे ते म्हणाले.
सिंघल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केंद्र सरकारचे कौतुक केले. ‘गेला काही काळ धर्म आणि संस्कृतीला गुलाम बनविण्यात आले होते. मात्र, आता तसं होणार नाही. सध्याचं सरकार हिंदूंचे संरक्षण करणारं आहे,’ असेही सिंघल म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


eight × 3 =