
अहमदनगर – अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जावखेड गावात झालेल्या तिहेरी हत्याकांडातील पाचही संशयितांची नार्को चाचणी करण्याची परवानगी सोमवारी पाथर्डी न्यायालयाने दिली.
२१ ऑक्टोबर रोजी जवखडे खालसा या गावातील एका दलित कुटुंबातील तिघांची ह्त्या झाल्याच्या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली होती. जाधव वस्तीत राहणा-या संजय जाधव, जयश्री जाधव व सुनील संजय जाधव यांची अत्यंत क्रूरपणे हत्या कऱण्यात आली होती.या घटनेनंतर समाजातील सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला होता. या घटनेच्या निषेधार्थ राज्यातील विविध ठिकाणी विविध संघटना तसेच राजकीय पक्षांकडून आंदोलनेही सुरु आहेत.









