जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकºयानी घेतले विष

IMG-20140324-WA0032
यवतमाळ – जिल्ह्यात गारपिटीने शेतातील पिके उद्घवस्त झाली असून शासनाने अजुनही आर्थीक मदत दिली नाही. अशातच आकपूरी येथील एका शेतकºयाने आज सोमवारी २४ मार्च रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्रशन केल्याने खळबळ उडाली आहे.
जनार्दन राऊत (६५)असे या शेतकºयाचे नाव आहे. जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या गारपिटीने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहे. शासनाने जाहीर केलेली मदत अद्यापही मिळाली नाही. त्यामुळे आज सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयात विष प्राशन केले. ही बाब निदर्शनास येताच शहर पोलिस व नागरिकांनी त्याला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. त्याचवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. या शेतकºयाच्या खिशात आढलेल्या तीन चिठ्ठीमध्ये एका राजकीय पदाधिकाºयासह काही अधिकाºयांची नावे असल्याची माहिती आहे. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख आ. संजय राठोड, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मांगुळकर यांच्यासह अनेक पदाधिकाºयांनी भेटी दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


− 4 = four