यवतमाळ (दि. १३ मार्च) – लोकसभा निवडणूकीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी निवडणूक संपेपर्यंतच्या कालावधीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात शंभर मीटर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहे.
या आदेशान्वये परिसरात पाच पेक्षा जास्त व्यक्तींना प्रवेश करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाही. मोबाईळ फोन, सेल्युलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसारमाध्यमे घेऊन परिसरात प्रवेश करता येणार नाही. शांतता व सुव्यवस्था भंग होईल असे कृत्य करता येणार नाही. अनधिकृत व्यक्ती व वाहनास प्रवेशास बंदी राहील, असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.









