
यवतमाळ – काँग्रेसमध्ये सर्वच पक्षातून प्रवेश घेणाºयांची संख्या वाढली असून, स्व. उत्तमराव पाटील यांच्या समर्थकांनी केलेल्या प्रवेशामुळे काँग्रेसची ताकद जिल्ह्यात वाढली आहे, असे प्रतिपादन प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांनी केले. येथील जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात शनिवारी राष्टÑवादी काँग्रेसमधील काही प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला, त्यावेळी ते बोलत होते.
जिल्ह्यातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असून, दादांचे सुपूत्र मनीष पाटील, माजी जि.प. अध्यक्ष प्रफुल्ल मानकर हा गट स्वगृही परतल्याने इतरांनाही पक्षात परतण्याची प्रेरणा मिळाली, असे ठाकरे म्हणाले. यावेळी राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष विलास राऊत, अरविंद फुटाणे, दिलीप कनाके, सागर इंगोले या राळेगाव तालुक्यातील राकाँ पदाधिकाºयांनी माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी शिवाजी मोघे, वसंत पुरके, संजय देशमुख, विजया धोटे, डॉ. टी.सी. राठोड आदी उपस्थित होते.









